शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कौटुंबिक भांडणात चढू नका न्यायालयाची पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:00 IST

भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत.

ठळक मुद्देनागपुरात वाद निवारण केंद्र समुपदेशन करून जोडली जातील मने

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक भांडणे सर्वाधिक संवेदनशील असतात. अशी भांडणे न्यायालयात गेल्यानंतर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण भरडले जातात. त्यामुळे ही भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत. त्यामुळे सामंजस्य व तडजोडीवर विश्वास असणाऱ्या दाम्पत्यांना आता कौटुंबिक वाद संपविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची गरज नाही.ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात आहे. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे कौटुंबिक वाद निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर कुटुंब न्यायालयामध्ये या केंद्रासाठी तीन वातानुकूलित खोल्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रात एकाचवेळी तीन दाम्पत्यांचे समुपदेशन करणे शक्य होणार आहे. समुपदेशनासाठी आठ विधिज्ञांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. गरजेनुसार मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. समुपदेशन यशस्वी झाल्यास संबंधित दाम्पत्याच्या सहमतीने अटी व शर्ती ठरवून त्यासंदर्भात लोक न्यायालयामार्फत आदेश जारी केला जाईल. त्या आदेशाविरुद्ध कुठेही अपील करता येणार नाही. त्यानंतर परत काही वाद झाल्यास संबंधित दाम्पत्याला अन्य उपलब्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येईल.कौटुंबिक वाद न्यायालयात दाखल करण्यासाठी आधी वकिलाकडे जाणे आवश्यक असते. वकील आपली बाजू बळकट करण्यासाठी विरुद्ध पक्षावर विविध आरोप करतो. असे दोन्ही बाजूने घडते. बरेचदा वकिलांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे क्षुल्लक वाद विकोपाला पोहोचतात. अभिमानापोटी कुणीही माघार घ्यायला तयार होत नाही.एकाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर दुसºया बाजूचे वरिष्ठ न्यायालयात धाव घेतात. अशाप्रकारे हे भांडण वर्षानुवर्षे सुरू राहते. शेवटी सर्वांना शारीरिक व मानसिक त्रास आणि मोठा खर्च सहन करावा लागतो.

व्यापक जनजागृती करूकौटुंबिक वाद निवारण केंद्राला यश मिळण्यासाठी त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्याकरिता वृत्तपत्रे, रेडिओ, पोस्टर्स, शिबिरे इत्यादी माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाईल. नागरिकांना कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडविणे का गरजेचे आहे हे पटवून दिले जाईल.- धनराज काळे, सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

टॅग्स :Familyपरिवार