शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

कौटुंबिक भांडणात चढू नका न्यायालयाची पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:00 IST

भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत.

ठळक मुद्देनागपुरात वाद निवारण केंद्र समुपदेशन करून जोडली जातील मने

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक भांडणे सर्वाधिक संवेदनशील असतात. अशी भांडणे न्यायालयात गेल्यानंतर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण भरडले जातात. त्यामुळे ही भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत. त्यामुळे सामंजस्य व तडजोडीवर विश्वास असणाऱ्या दाम्पत्यांना आता कौटुंबिक वाद संपविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची गरज नाही.ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात आहे. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे कौटुंबिक वाद निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर कुटुंब न्यायालयामध्ये या केंद्रासाठी तीन वातानुकूलित खोल्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रात एकाचवेळी तीन दाम्पत्यांचे समुपदेशन करणे शक्य होणार आहे. समुपदेशनासाठी आठ विधिज्ञांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. गरजेनुसार मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. समुपदेशन यशस्वी झाल्यास संबंधित दाम्पत्याच्या सहमतीने अटी व शर्ती ठरवून त्यासंदर्भात लोक न्यायालयामार्फत आदेश जारी केला जाईल. त्या आदेशाविरुद्ध कुठेही अपील करता येणार नाही. त्यानंतर परत काही वाद झाल्यास संबंधित दाम्पत्याला अन्य उपलब्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येईल.कौटुंबिक वाद न्यायालयात दाखल करण्यासाठी आधी वकिलाकडे जाणे आवश्यक असते. वकील आपली बाजू बळकट करण्यासाठी विरुद्ध पक्षावर विविध आरोप करतो. असे दोन्ही बाजूने घडते. बरेचदा वकिलांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे क्षुल्लक वाद विकोपाला पोहोचतात. अभिमानापोटी कुणीही माघार घ्यायला तयार होत नाही.एकाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर दुसºया बाजूचे वरिष्ठ न्यायालयात धाव घेतात. अशाप्रकारे हे भांडण वर्षानुवर्षे सुरू राहते. शेवटी सर्वांना शारीरिक व मानसिक त्रास आणि मोठा खर्च सहन करावा लागतो.

व्यापक जनजागृती करूकौटुंबिक वाद निवारण केंद्राला यश मिळण्यासाठी त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्याकरिता वृत्तपत्रे, रेडिओ, पोस्टर्स, शिबिरे इत्यादी माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाईल. नागरिकांना कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडविणे का गरजेचे आहे हे पटवून दिले जाईल.- धनराज काळे, सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

टॅग्स :Familyपरिवार