शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक भांडणात चढू नका न्यायालयाची पायरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:00 IST

भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत.

ठळक मुद्देनागपुरात वाद निवारण केंद्र समुपदेशन करून जोडली जातील मने

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कौटुंबिक भांडणे सर्वाधिक संवेदनशील असतात. अशी भांडणे न्यायालयात गेल्यानंतर लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण भरडले जातात. त्यामुळे ही भांडणे सामंजस्याने व तडजोडीने संपविणे सर्वांच्या सोयीचे समजले जाते. ही संकल्पना राज्यामध्ये कौटुंबिक वाद निवारण केंद्राच्या माध्यमातून पुढे नेली जात आहे. या केंद्रात समुपदेशन करून तुटलेली मने जोडली जाणार आहेत. त्यामुळे सामंजस्य व तडजोडीवर विश्वास असणाऱ्या दाम्पत्यांना आता कौटुंबिक वाद संपविण्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याची गरज नाही.ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जात आहे. सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर येथे कौटुंबिक वाद निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. नागपूर कुटुंब न्यायालयामध्ये या केंद्रासाठी तीन वातानुकूलित खोल्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रात एकाचवेळी तीन दाम्पत्यांचे समुपदेशन करणे शक्य होणार आहे. समुपदेशनासाठी आठ विधिज्ञांचे पॅनल तयार करण्यात आले आहे. गरजेनुसार मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. समुपदेशन यशस्वी झाल्यास संबंधित दाम्पत्याच्या सहमतीने अटी व शर्ती ठरवून त्यासंदर्भात लोक न्यायालयामार्फत आदेश जारी केला जाईल. त्या आदेशाविरुद्ध कुठेही अपील करता येणार नाही. त्यानंतर परत काही वाद झाल्यास संबंधित दाम्पत्याला अन्य उपलब्ध कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येईल.कौटुंबिक वाद न्यायालयात दाखल करण्यासाठी आधी वकिलाकडे जाणे आवश्यक असते. वकील आपली बाजू बळकट करण्यासाठी विरुद्ध पक्षावर विविध आरोप करतो. असे दोन्ही बाजूने घडते. बरेचदा वकिलांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे क्षुल्लक वाद विकोपाला पोहोचतात. अभिमानापोटी कुणीही माघार घ्यायला तयार होत नाही.एकाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर दुसºया बाजूचे वरिष्ठ न्यायालयात धाव घेतात. अशाप्रकारे हे भांडण वर्षानुवर्षे सुरू राहते. शेवटी सर्वांना शारीरिक व मानसिक त्रास आणि मोठा खर्च सहन करावा लागतो.

व्यापक जनजागृती करूकौटुंबिक वाद निवारण केंद्राला यश मिळण्यासाठी त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्याकरिता वृत्तपत्रे, रेडिओ, पोस्टर्स, शिबिरे इत्यादी माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाईल. नागरिकांना कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडविणे का गरजेचे आहे हे पटवून दिले जाईल.- धनराज काळे, सचिव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण.

टॅग्स :Familyपरिवार