शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

देशाची सत्ता बहुसंख्य समाजाकडे हवी : मोहन गोपाल यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:34 IST

देशातील राजकीय व प्रशासकीय सत्ता बहुसंख्य समाजाकडे येणे आवश्यक आहे. त्याशिवाय या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही असे मत राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रा. मोहन गोपाल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील राजकीय व प्रशासकीय सत्ता बहुसंख्य समाजाकडे येणे आवश्यक आहे. त्याशिवाय या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही असे मत राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रा. मोहन गोपाल यांनी व्यक्त केले.हैदराबाद येथे बुधवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चौथे अधिवेशन यशस्वी पार पडले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. तेलंगणाचे शिक्षण व आरोग्यमंत्री इटेला राजेंदर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे अध्यक्षस्थानी तर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, स्वागताध्यक्ष श्रीनिवास गौड,अखिल भारतीय मागासवर्गीय महासंघाचे अध्यक्ष व्ही. ईश्वरैया, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पिली सुभाषचंद्र बोस, तेलंगणाचे पशुधन विकासमंत्री तलासनी श्रीनिवास यादव, उत्पादन शुल्कमंत्री व्ही. श्रीनिवास गौड, महाराष्ट्राचे पशुधन विकासमंत्री महादेव जानकर, माजी खासदार नाना पटोले, माजी खासदार खुशाल बोपचे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.भारतात बहुसंख्य असलेल्या इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक शोषण होत आहे. त्यामुळे या समाजाचा अद्याप विकास झाला नाही. या समाजांनी संघटित होऊन वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची गरज आहे असे गोपाल यांनी पुढे बोलताना सांगितले.जानकर म्हणाले, ओबीसी समाज ज्यांच्याकडे मदतीची आस लावून बसलेला आहे, त्यांची नियत चांगली नाही. ते या समाजाला काहीही देणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने स्वत:च राजकीय शक्ती निर्माण करणे काळाची गरज आहे. या समाजाने स्वत:चा पक्ष स्थापन केला पाहिजे.ओबीसी महासंघ अराजकीय संघटना आहे. ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन समाजाच्या अधिकारासाठी लढा द्यावा. आज गुणवत्ता वाचविण्याच्या नावाखाली ओबीसी आरक्षणाचा विरोध केला जात आहे. ओबीसी लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची जनगणना केली जात नाही असे जीवतोडे यांनी सांगितले. दरम्यान, अन्य मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीnagpurनागपूर