शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

देशाची सत्ता बहुसंख्य समाजाकडे हवी : मोहन गोपाल यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:34 IST

देशातील राजकीय व प्रशासकीय सत्ता बहुसंख्य समाजाकडे येणे आवश्यक आहे. त्याशिवाय या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही असे मत राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रा. मोहन गोपाल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील राजकीय व प्रशासकीय सत्ता बहुसंख्य समाजाकडे येणे आवश्यक आहे. त्याशिवाय या समाजाचा उद्धार होऊ शकत नाही असे मत राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे माजी संचालक प्रा. मोहन गोपाल यांनी व्यक्त केले.हैदराबाद येथे बुधवारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चौथे अधिवेशन यशस्वी पार पडले. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. तेलंगणाचे शिक्षण व आरोग्यमंत्री इटेला राजेंदर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे अध्यक्षस्थानी तर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, स्वागताध्यक्ष श्रीनिवास गौड,अखिल भारतीय मागासवर्गीय महासंघाचे अध्यक्ष व्ही. ईश्वरैया, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पिली सुभाषचंद्र बोस, तेलंगणाचे पशुधन विकासमंत्री तलासनी श्रीनिवास यादव, उत्पादन शुल्कमंत्री व्ही. श्रीनिवास गौड, महाराष्ट्राचे पशुधन विकासमंत्री महादेव जानकर, माजी खासदार नाना पटोले, माजी खासदार खुशाल बोपचे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.भारतात बहुसंख्य असलेल्या इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक शोषण होत आहे. त्यामुळे या समाजाचा अद्याप विकास झाला नाही. या समाजांनी संघटित होऊन वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा देण्याची गरज आहे असे गोपाल यांनी पुढे बोलताना सांगितले.जानकर म्हणाले, ओबीसी समाज ज्यांच्याकडे मदतीची आस लावून बसलेला आहे, त्यांची नियत चांगली नाही. ते या समाजाला काहीही देणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने स्वत:च राजकीय शक्ती निर्माण करणे काळाची गरज आहे. या समाजाने स्वत:चा पक्ष स्थापन केला पाहिजे.ओबीसी महासंघ अराजकीय संघटना आहे. ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन समाजाच्या अधिकारासाठी लढा द्यावा. आज गुणवत्ता वाचविण्याच्या नावाखाली ओबीसी आरक्षणाचा विरोध केला जात आहे. ओबीसी लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांची जनगणना केली जात नाही असे जीवतोडे यांनी सांगितले. दरम्यान, अन्य मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीnagpurनागपूर