शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

मलमूत्राच्या योग्य विल्हेवाटीमुळेच देश स्वच्छ होईल : सोपान जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:40 IST

देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद्या, जमिनीवर प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी मलमूत्र,घाण पाणी वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ आणि ‘जल थल मल’ पुस्तकाचे लेखक सोपान जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘शरीर से नदी की दुरी’ यावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद्या, जमिनीवर प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी मलमूत्र,घाण पाणी वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ आणि ‘जल थल मल’ पुस्तकाचे लेखक सोपान जोशी यांनी व्यक्त केले.नागपूर एन्व्हायर्नमेंट फोरम, बीजोत्सव, कॅग आणि निसर्गायनच्या संयुक्त विद्यमाने ‘शरीर से नदी की दुरी’ या विषयावर सोपान जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ते म्हणाले, लडाखचे लोक छागरा नावाचे शौचालय वापरतात. टाकीत मलावर माती टाकण्यात येत असल्यामुळे तो मल सुकल्यावर त्याचा शेतीत खत म्हणून वापर होतो. तिरुचेरापल्लीचे नागरिक इकोसॅन हे शौचालय वापरतात. इकोसॅनमध्ये मल, मूत्र, पाणी वेगवेगळे करण्याची सुविधा आहे. या शौचालयामुळे मलाची माती होऊन त्याची दुर्गंधी येत नाही. मलामुळे खत आणि मूत्रातून शेतकऱ्यांना नायट्रोजन मिळते. या दोन्ही बाबी शेतीसाठी उपयुक्त आहेत. बंगळुरूमध्ये नायट्रोजन मिळत असल्यामुळे घाण पाणी शेतात टाकतात. परंतु श्रीमंत नागरिक शौचालयात केमिकल, सौंदर्य प्रसाधने वापरत असल्यामुळे तेथील नागरिक श्रीमंत वस्तीतील शौचालयाचे पाणी शेतात वापरत नाहीत. डीवॉट्स पद्धतीतही घाण पाण्याला पुनर्वापर करण्यायोग्य बनविल्या जाते. हे पाणी कूलर, झाडांसाठी वापरता येते. कोलकातामध्ये घाण पाण्यात मासेमार माश्यांचे उत्पादन घेतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात मासे मिळून शहरातील घाण पाण्याचा बंदोबस्त होतो. त्यामुळे मल-मूत्र-घाण पाणी वेगवेगळे करण्याच्या पद्धतीचा सगळीकडे वापर केल्यास आणि मल-मूत्राची योग्य विल्हेवाट लावल्यास देश स्वच्छ होईल, असे जोशी यांनी सांगितले. संचालन अतुल उपाध्याय यांनी केले. बीजोत्सव, कॅग, नागपूर एन्व्हायर्नमेंट फोरम, निसर्गायनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘वेस्टर्न टॉयलेट’ दोषपूर्णदेशात ‘वेस्टर्न टॉयलेट’ बसविण्याचे अभियान जोरात सुरू आहे. त्यासाठी शासन अनुदान देत आहे. परंतु यामुळे घाणीची समस्या सुटणार नसून ती वाढणार आहे. या शौचालयात मलमूत्र, पाणी एकत्र होते आणि त्याचा कुठलाही वापर न झाल्यामुळे ते थेट जल स्रोतात मिसळते. त्यासाठी देशाच्या विविध भागात मलमूत्राच्या विल्हेवाटीच्या पद्धती पाहून त्या-त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या वापरल्यास भूजल, तलाव, नद्या प्रदूषित होणार नाहीत, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर