शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

मलमूत्राच्या योग्य विल्हेवाटीमुळेच देश स्वच्छ होईल : सोपान जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:40 IST

देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद्या, जमिनीवर प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी मलमूत्र,घाण पाणी वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ आणि ‘जल थल मल’ पुस्तकाचे लेखक सोपान जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘शरीर से नदी की दुरी’ यावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात स्वच्छता अभियानाची सुरुवात १९८६ पासून झाली. १९९९ मध्ये त्याचे नाव ‘टोटल सॅनिटेशन कॅम्पेन’, २०१२ मध्ये निर्मल भारत अभियान आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियान ठेवण्यात आले. नावे बदलली परंतु ३२ वर्षांपासून स्वच्छतेची स्थिती तीच आहे. देशातील तलाव, नद्या, जमिनीवर प्रदूषण वाढले आहे. त्यासाठी मलमूत्र,घाण पाणी वेगळे करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यास भारत स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पर्यावरण तज्ज्ञ आणि ‘जल थल मल’ पुस्तकाचे लेखक सोपान जोशी यांनी व्यक्त केले.नागपूर एन्व्हायर्नमेंट फोरम, बीजोत्सव, कॅग आणि निसर्गायनच्या संयुक्त विद्यमाने ‘शरीर से नदी की दुरी’ या विषयावर सोपान जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ते म्हणाले, लडाखचे लोक छागरा नावाचे शौचालय वापरतात. टाकीत मलावर माती टाकण्यात येत असल्यामुळे तो मल सुकल्यावर त्याचा शेतीत खत म्हणून वापर होतो. तिरुचेरापल्लीचे नागरिक इकोसॅन हे शौचालय वापरतात. इकोसॅनमध्ये मल, मूत्र, पाणी वेगवेगळे करण्याची सुविधा आहे. या शौचालयामुळे मलाची माती होऊन त्याची दुर्गंधी येत नाही. मलामुळे खत आणि मूत्रातून शेतकऱ्यांना नायट्रोजन मिळते. या दोन्ही बाबी शेतीसाठी उपयुक्त आहेत. बंगळुरूमध्ये नायट्रोजन मिळत असल्यामुळे घाण पाणी शेतात टाकतात. परंतु श्रीमंत नागरिक शौचालयात केमिकल, सौंदर्य प्रसाधने वापरत असल्यामुळे तेथील नागरिक श्रीमंत वस्तीतील शौचालयाचे पाणी शेतात वापरत नाहीत. डीवॉट्स पद्धतीतही घाण पाण्याला पुनर्वापर करण्यायोग्य बनविल्या जाते. हे पाणी कूलर, झाडांसाठी वापरता येते. कोलकातामध्ये घाण पाण्यात मासेमार माश्यांचे उत्पादन घेतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात मासे मिळून शहरातील घाण पाण्याचा बंदोबस्त होतो. त्यामुळे मल-मूत्र-घाण पाणी वेगवेगळे करण्याच्या पद्धतीचा सगळीकडे वापर केल्यास आणि मल-मूत्राची योग्य विल्हेवाट लावल्यास देश स्वच्छ होईल, असे जोशी यांनी सांगितले. संचालन अतुल उपाध्याय यांनी केले. बीजोत्सव, कॅग, नागपूर एन्व्हायर्नमेंट फोरम, निसर्गायनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘वेस्टर्न टॉयलेट’ दोषपूर्णदेशात ‘वेस्टर्न टॉयलेट’ बसविण्याचे अभियान जोरात सुरू आहे. त्यासाठी शासन अनुदान देत आहे. परंतु यामुळे घाणीची समस्या सुटणार नसून ती वाढणार आहे. या शौचालयात मलमूत्र, पाणी एकत्र होते आणि त्याचा कुठलाही वापर न झाल्यामुळे ते थेट जल स्रोतात मिसळते. त्यासाठी देशाच्या विविध भागात मलमूत्राच्या विल्हेवाटीच्या पद्धती पाहून त्या-त्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्या वापरल्यास भूजल, तलाव, नद्या प्रदूषित होणार नाहीत, असे जोशी म्हणाले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर