शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:04 IST

देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ‘द रॅडिकल इन आंबेडकर क्रिटिकल रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.डॉ. सूरज येंगडे व डॉ. आनंद तेलतुंबडे संपादित ‘द रॅडिकल इन आंबेडकर क्रिटिकल रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अन्य वक्त्यांमध्ये अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. गौतम कांबळे यांचा समावेश होता. डॉ. येंगडे व्यासपीठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या ना. ह. कुंभारे सभागृहात झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतासाठी नाही तर, संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी भारताला दिलेली राज्यघटना जगात सर्वोत्कृष्ट व सर्वसमावेशक आहे. त्यांच्याशिवाय कुणीही अशी राज्यघटना तयार करू शकले नसते. ही राज्यघटना सर्वांचे कल्याण करणारी आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या बाहेर जाऊन कोणतीही कृती या देशात व्हायला नको असे थोरात यांनी पुढे बोलताना सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशातील अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी देश व समाजाकरिता दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही असे विचार खांदेवाले यांनी व्यक्त केले.वर्तमान काळात या जगाची भांडवलवादी व समाजवादी अशी विभागणी केली जाऊ शकते. देशात एकीकडे मूठभर लोक दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत असून दुसरीकडे दारिद्र्य वाढत आहे. ही विषमता येणाऱ्या काळात संपणे आवश्यक आहे असे कांबळे यांनी तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तिमत्त्व होते असे येंगडे यांनी सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर