शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:04 IST

देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ‘द रॅडिकल इन आंबेडकर क्रिटिकल रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देश राज्यघटनेनुसारच चालायला पाहिजे. अन्यथा देशातील जनतेत असंतोष निर्माण होईल असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.डॉ. सूरज येंगडे व डॉ. आनंद तेलतुंबडे संपादित ‘द रॅडिकल इन आंबेडकर क्रिटिकल रिफ्लेक्शन्स’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अन्य वक्त्यांमध्ये अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले व डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. गौतम कांबळे यांचा समावेश होता. डॉ. येंगडे व्यासपीठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या ना. ह. कुंभारे सभागृहात झाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ भारतासाठी नाही तर, संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी भारताला दिलेली राज्यघटना जगात सर्वोत्कृष्ट व सर्वसमावेशक आहे. त्यांच्याशिवाय कुणीही अशी राज्यघटना तयार करू शकले नसते. ही राज्यघटना सर्वांचे कल्याण करणारी आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या बाहेर जाऊन कोणतीही कृती या देशात व्हायला नको असे थोरात यांनी पुढे बोलताना सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशातील अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणले. त्यांनी देश व समाजाकरिता दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही असे विचार खांदेवाले यांनी व्यक्त केले.वर्तमान काळात या जगाची भांडवलवादी व समाजवादी अशी विभागणी केली जाऊ शकते. देशात एकीकडे मूठभर लोक दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत असून दुसरीकडे दारिद्र्य वाढत आहे. ही विषमता येणाऱ्या काळात संपणे आवश्यक आहे असे कांबळे यांनी तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यक्तिमत्त्व होते असे येंगडे यांनी सांगितले.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर