शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

देह कटे पर देश कभी नही कटता है..!

By admin | Updated: November 16, 2014 00:47 IST

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. आजही सीमेवर तैनात असणारे सैनिक घरापासून, आपल्या प्रिय नातलगांपासून दुर असतात. देशवासी सुरक्षित

सनातन योगा श्राईनतर्फे राष्ट्रभक्तीच्या कवितांचा कार्यक्रम नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. आजही सीमेवर तैनात असणारे सैनिक घरापासून, आपल्या प्रिय नातलगांपासून दुर असतात. देशवासी सुरक्षित राहावे म्हणून डोळ्यात प्राण साठवून ते सीमांचे रक्षण करतात. अनेकदा युद्धात ते शहीदही होतात. कारगील युद्धाच्यावेळी नुकतेच विवाह झालेले अनेक जवान शहीद झाले. या युद्धात नुकत्याच लग्न झालेल्या २२ ते २५ वर्षाच्या नववधू विधवा झाल्या. आयुष्याची सारी स्वप्नेच उधळली गेली. या नववधूंचे अश्रू पाहण्याचे सामर्थ्य कुणातही नव्हते. त्या प्रसंगांवर कवी डॉ. व्ही. पी. सिंग यांनी दोन ओळी ऐकविल्या आणि सभागृहाच्या अंगावर काटा उभा राहिला. ‘उन आँखों के आसू पर सात समंदर हारे हारे है...मेहंदीवाले हाथो ने जब मंगलसूत्र उतारे है..’अमेरिकेच्या शिकागो येथील धर्मसंसदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने संपूर्ण जगाला जिंकले होते. त्या भाषणाला यंदा १२१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सनातन योगा श्राईनच्यावतीने स्वामी विवेकानंदांचे स्मरण करताना राष्ट्रभक्तीच्या कवितांचा ‘जननी जन्मभूमी’ हा कार्यक्रम साई सभागृहात आयोजित केला. या कार्यक्रमात राष्ट्रीय कवी डॉ. व्ही. पी. सिंग यांनी कवितांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग चेतविले. कधी सैनिकांच्या व्यथा तर कधी राजकारण्यांची बेगडी देशभक्ती कवितेतून व्यक्त करीत सैनिकही अखेर एक माणूस असतो. त्याच्या पत्नीची आणि मुलांची त्याला आठवण येते, त्यांच्यासाठी सीमेवर असताना तो व्याकुळ होतो. त्यालाही वृद्ध मातापित्यांची आठवण येते, पण देशासाठी लढताना तो सारे विसरतो. सैन्यात हे सारे आपण जवळून अनुभवले आहे. आईच्या आठवणीने व्याकुळ झाल्यावर सैनिकांचे पाणावलेले डोळे मी पाहिले आहेत आणि सैनिकांच्या तरुण विधवांचे अश्रू मी अनुभवले आहे, असे सांगत डॉ. सिंग यांनी उपस्थितांच्या हृदयाला हात घातला. या अनुभवातूनच आपल्या कविता निर्माण झाल्या आणि सैनिकांच्या भावना शब्दबद्ध झाल्या. अनेकवेळा युुवा पत्नींचे पत्र सैनिकांना येतात. त्यांना आठवण येते म्हणून त्या सैनिकांना परत घरी बोलावत असतात पण जाज्वल्य देशप्रेमाने भारलेला सैनिक या भावनेवर मात करून आपल्या पत्नीला उलट टपाली देशप्रेमाचेच धडे देत असतात. ही भावना फार मोठी आहे. पण आपल्या देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना पुरेसा सन्मान मिळत नाही.दहशतवादी कारवाया आणि शेजारी शत्रूराष्ट्रांचा बंदोबस्त करण्यात नेहमीच सरकार चुकते. प्रेम, क्षमा, बोलणी या बाबींनी आतापर्यंत काहीही थांबले नाहीच. पाकिस्तानच्या संदर्भात भावना करताना ते व्यक्त म्हणाले, ‘जहरीले साप कभी करुणा की बात नही सुनते...वे तभी मानते है जब उनके दात उखाडे जाते है’ हे बदलावे म्हणून ‘अब शपथ उठाओ, भारत का अपमान नही होने देंगे’ अशा ओळींनी त्यांनी दाद घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्नल सुनील देशपांडे, डॉ. अर्चना पटेल, सविता संचेती, सुरेश शर्मा, योगाचार्य केदार जोशी उपस्थित होते. याप्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देत समाजाची सेवा करणाऱ्या सात मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यात योगगुरु रामभाऊ खांडवे, शोभा ग्रोव्हर, स्वामिनी ब्रह्मप्रकाशानंदा, सुरेश शर्मा, अवंतिका चिटणवीस, जी. एम. टावरी, डॉ. व्ही. पी. सिंग यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन योगाचार्य केदार जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)