शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

देशात समान लोकसंख्या धोरण हवे : राष्ट्रसेविका समितीची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:52 IST

देशात विशिष्ट समाजाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात असंतुलित वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. देशात हिंदूंचे घटणारे प्रमाण देशाची ओळख व अस्तित्वासाठी धोका बनत आहे. याशिवाय आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच कार्यक्षमतेवर परिणाम करीत आहे. यामुळे देशात समान लोकसंख्या धोरण लागू करायला हवे, अशी भूमिका राष्ट्रसेविका समितीतर्फे घेण्यात आली आहे. समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी व प्रतिनिधी मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समान लोकसंख्या धोरणासंदर्भातील प्रस्ताव संमत करण्यात आला.

ठळक मुद्देअखिल भारतीय कार्यकारिणी बैठक संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात विशिष्ट समाजाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात असंतुलित वातावरण निर्माण होण्याची भीती आहे. देशात हिंदूंचे घटणारे प्रमाण देशाची ओळख व अस्तित्वासाठी धोका बनत आहे. याशिवाय आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच कार्यक्षमतेवर परिणाम करीत आहे. यामुळे देशात समान लोकसंख्या धोरण लागू करायला हवे, अशी भूमिका राष्ट्रसेविका समितीतर्फे घेण्यात आली आहे. समितीच्या अखिल भारतीय कार्यकारिणी व प्रतिनिधी मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत समान लोकसंख्या धोरणासंदर्भातील प्रस्ताव संमत करण्यात आला.रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का व प्रमुख कार्यवाहिका सीता अन्नदानम् प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला. १९५१ साली देशात हिंदूंची संख्या ८८ टक्के होती. आता हा आकडा ८० टक्क्यांहून खाली आला आहे. काश्मीर, बिहार व बंगालमधील तीन जिल्हे, केरळमधील दोन जिल्हे व आसाममधील नऊ जिल्ह्यांसह उत्तर प्रदेशच्या काही भागात सामाजिक सौहार्द संपत चालला असल्याचे अलीकडच्या घटनांमधून दिसून येत आहे. अनेक ठिकाणी राज्य सरकारदेखील कमकुवत आहेत. लोकसंख्येचे असंतुलन भारताच्या अखंडतेवरदेखील संकट निर्माण करणारे आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने संपूर्ण देशासाठी समान लोकसंख्या धोरणाला लागू करावे, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीवर नियंत्रण आणावे, ‘एनआरसी’ संपूर्ण देशात लागू करावे, बेकायदेशीरपणे राहणाºया विदेशींना बाहेर काढावे, अशा नागरिकांना भारताची नागरिकता मिळू नये तसेच त्यांना अचल संपत्ती खरेदी करण्याचे अधिकार असू नयेत अशी व्यवस्था उभारावी, अशी भूमिका समितीतर्फे या बैठकीत मांडण्यात आली. अनेक देशांमध्ये धर्मांतरणामुळे देशाच्या सुरक्षेवर संकट येते व सामाजिक संघर्षदेखील निर्माण होतो. जगातील अनेक देशांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे धर्मांतरणावर बंदी आणण्यासाठी प्रभावी कायदा लागू केला पाहिजे, असादेखील बैठकीतील सूर होता.देश प्रगतिपथावर आहेयावेळी शांताक्का यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. देश सर्वच क्षेत्रात प्रगतिपथावर आहे. एकत्रित प्रयत्नातून व महिलाशक्तीच्या नेतृत्वातून चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात यश आले. समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. संकल्पाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची गरज आहे. दृढसंकल्प, इच्छाशक्तीला उद्यमशीलतेची जोड मिळाली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.देशभरात तरुणींसाठी आत्मसुरक्षा मोहीम राबविणारया बैठकीमध्ये देशभरातून दोनशेहून अधिक समिती सदस्य सहभागी झाल्या होत्या. पुढील वर्षभरात संपूर्ण देशातील विविध ठिकाणी तरुणींसाठी आत्मसुरक्षा मोहीम राबविण्यात येणार आहे. सोबतच बालिका, तरुणी, गृहिणी, उद्योजिका इत्यादींसाठी विशेष कार्यक्रम निश्चित झाले. राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका सरस्वतीबाई आपटे यांचे २५ वे स्मृतिवर्ष आहे. त्यांच्या विचारांचा जागर या वर्षभरात करण्यात येणार आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघWomenमहिला