शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

 पऱ्हाटी जमिनीत गाडा : बोंडअळी नष्ट करण्यासाठी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 20:13 IST

कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे.कापूस हे राज्यातील प्रमुख नगदी पीक आहे. राज्यात सरासरी ४१.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. खरीप २०१७ मध्ये ४२.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली असून त्यामध्ये बीटी वाणांचा समावेश करण्यात आला आहे. २०१७ च्या खरीप हंगामात महाराष्ट्रातील सर्वच कापूस उत्पादक जिल्हयांमध्ये शेंदरी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक असून कापूस उत्पादनाशी निगडीत सर्व यंत्रणा जसे शेतकरी, कृषी विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादन कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे गोडाऊन, जिनिंग प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी