शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

 पऱ्हाटी जमिनीत गाडा : बोंडअळी नष्ट करण्यासाठी उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 20:13 IST

कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड न घेता पऱ्हाट्या रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे शेंदरी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होईल, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांच्या वतीने करण्यात आले आहे.कापूस हे राज्यातील प्रमुख नगदी पीक आहे. राज्यात सरासरी ४१.२९ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाते. खरीप २०१७ मध्ये ४२.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली असून त्यामध्ये बीटी वाणांचा समावेश करण्यात आला आहे. २०१७ च्या खरीप हंगामात महाराष्ट्रातील सर्वच कापूस उत्पादक जिल्हयांमध्ये शेंदरी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल.शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणाच्या दृष्टीने एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करणे आवश्यक असून कापूस उत्पादनाशी निगडीत सर्व यंत्रणा जसे शेतकरी, कृषी विभाग, कापूस पीक संशोधन संस्था, बियाणे उत्पादन कंपन्या, कीटकनाशक कंपन्या, कापूस खरेदी केंद्रे गोडाऊन, जिनिंग प्रेसिंग मिल्स इत्यादी संस्थांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी