शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

By योगेश पांडे | Updated: November 30, 2022 16:51 IST

प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

नागपूर :महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. याचा फायदा घेत विमा कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला. हे मागील मुख्यमंत्र्यांचे अपयश होते व या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकासआघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले, मात्र अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनीदेखील त्यासाठी पुढाकार घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाही. पीकविमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होत्या. मात्र खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याची तसदीच कुणी घेतली नाही. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटारडे

यावेळी त्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले. मागील सरकारने वेदांताला कुठेही जागा दिली नव्हती हे माहिती अधिकारातूनच समोर आले आहे. त्यासंदर्भात कुठेही बैठकदेखील घेण्यात आली नव्हती. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग कंपन्यांचे प्रतिनिधी कोणाशी बोलले असते असा सवाल करत बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांचे आरोप खोटारडे असल्याचा दावा केला.

राज्यपालांची चूकच झाली

आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. त्यांची त्यादिवशी चूकच झाली आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे.. त्यांना ठेवायचे की नाही हे आमच्या अधिकार क्षेत्रात नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCrop Insuranceपीक विमा