शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांचा भ्रष्टाचार; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

By योगेश पांडे | Updated: November 30, 2022 16:51 IST

प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

नागपूर :महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. याचा फायदा घेत विमा कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला. हे मागील मुख्यमंत्र्यांचे अपयश होते व या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकासआघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले, मात्र अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनीदेखील त्यासाठी पुढाकार घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठक सुद्धा त्या काळात झाल्या नाही. पीकविमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होत्या. मात्र खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याची तसदीच कुणी घेतली नाही. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे आरोप खोटारडे

यावेळी त्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले. मागील सरकारने वेदांताला कुठेही जागा दिली नव्हती हे माहिती अधिकारातूनच समोर आले आहे. त्यासंदर्भात कुठेही बैठकदेखील घेण्यात आली नव्हती. वेदांता प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गेला आहे. उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयातच येत नव्हते. मग कंपन्यांचे प्रतिनिधी कोणाशी बोलले असते असा सवाल करत बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांचे आरोप खोटारडे असल्याचा दावा केला.

राज्यपालांची चूकच झाली

आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. त्यांची त्यादिवशी चूकच झाली आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे.. त्यांना ठेवायचे की नाही हे आमच्या अधिकार क्षेत्रात नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCrop Insuranceपीक विमा