शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मेट्रोसाठी पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 9:00 PM

पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के काम झाले आहे. अर्धवट बांधकामामुळे जवळपास चार वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देजय जवान, जय किसान संघटनेचा आरोप : आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के काम झाले आहे. अर्धवट बांधकामामुळे जवळपास चार वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.यासंदर्भात ‘जय जवान, जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले की, पूर्व नागपुरात पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती संथ असल्याच्या कारणावरून आंदोलन करण्यात आले आहे. नागरिकांना सुविधायुक्त ठरणाऱ्या या पुलाचे बांधकाम वारंवार का थांबविण्यात येत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. बांधकाम वेळेत पूर्ण न होण्यासाठी कुणाची तर चूक नक्कीच आहे. या चुकीची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. प्रकल्पाला उशीर होत असल्यामुळे सामान्य नागरिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कामाला वेळ लागत असल्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसणार आहे. पूर्वी डिझायनिंगवर शिक्कामोर्तब न केल्यामुळे आता बांधकामाच्या नावावर लोकांच्या जमिनी ताब्यात घेण्यात येत आहे. ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले, त्या कंपनीच्या स्थितीचे योग्यरीत्या आकलन करण्यात आलेले नाही. कुणाला तरी फायदा होण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचे बांधकाम सुरू केल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विकासात पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामासंदर्भात थट्टा सुरू आहे. त्यावर पांघरूण घालता येणार नाही. या मुद्यांवर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.प्रकल्पाची स्थिती

  •  २१ ऑगस्ट २०१४ मध्ये प्रकल्पाचे उद्घाटन.
  • ४४८ कोटी रुपयांच्या किमतीसह मार्च २०१६ मध्ये काम सुरू.
  •  पारडी नाका ते इतवारीपर्यंत ३.४ कि़मी., कळमना ते मानेवाडापर्यंत ३ कि़मी., प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौकापर्यंत ७.४ कि़मी. लांबीचा उड्डाणपूल.
  •  २०१८ पर्यंत जवळपास २५ टक्के बांधकाम.

पावसाळ्यात अपघाताची शक्यताप्रकल्पात उड्डाणपुलासोबतच रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्याचे बांधकामही अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून अपघात वाढण्याची शक्यता आहे. या मार्गावरून नागरिकांना वाहन काढणे कठीण होणार आहे. याशिवाय लगतच्या वस्त्यांमधून नागरिकांना रस्त्यावर येणे कठीण होऊन ये-जा बंद होणार आहे.

 

टॅग्स :Metroमेट्रोCorruptionभ्रष्टाचार