शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

मेट्रोसाठी पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:01 IST

पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के काम झाले आहे. अर्धवट बांधकामामुळे जवळपास चार वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देजय जवान, जय किसान संघटनेचा आरोप : आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के काम झाले आहे. अर्धवट बांधकामामुळे जवळपास चार वर्षांपासून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.यासंदर्भात ‘जय जवान, जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी सांगितले की, पूर्व नागपुरात पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती संथ असल्याच्या कारणावरून आंदोलन करण्यात आले आहे. नागरिकांना सुविधायुक्त ठरणाऱ्या या पुलाचे बांधकाम वारंवार का थांबविण्यात येत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. याशिवाय बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी. बांधकाम वेळेत पूर्ण न होण्यासाठी कुणाची तर चूक नक्कीच आहे. या चुकीची शिक्षा त्यांना मिळालीच पाहिजे. प्रकल्पाला उशीर होत असल्यामुळे सामान्य नागरिक आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कामाला वेळ लागत असल्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसणार आहे. पूर्वी डिझायनिंगवर शिक्कामोर्तब न केल्यामुळे आता बांधकामाच्या नावावर लोकांच्या जमिनी ताब्यात घेण्यात येत आहे. ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आले, त्या कंपनीच्या स्थितीचे योग्यरीत्या आकलन करण्यात आलेले नाही. कुणाला तरी फायदा होण्याच्या दृष्टीने प्रकल्पाचे बांधकाम सुरू केल्याचे दिसून येत आहे. शहराच्या विकासात पारडी उड्डाणपुलाच्या बांधकामासंदर्भात थट्टा सुरू आहे. त्यावर पांघरूण घालता येणार नाही. या मुद्यांवर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.प्रकल्पाची स्थिती

  •  २१ ऑगस्ट २०१४ मध्ये प्रकल्पाचे उद्घाटन.
  • ४४८ कोटी रुपयांच्या किमतीसह मार्च २०१६ मध्ये काम सुरू.
  •  पारडी नाका ते इतवारीपर्यंत ३.४ कि़मी., कळमना ते मानेवाडापर्यंत ३ कि़मी., प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौकापर्यंत ७.४ कि़मी. लांबीचा उड्डाणपूल.
  •  २०१८ पर्यंत जवळपास २५ टक्के बांधकाम.

पावसाळ्यात अपघाताची शक्यताप्रकल्पात उड्डाणपुलासोबतच रस्त्याचे बांधकाम करण्यात येत आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम अर्धवट असल्यामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्याचे बांधकामही अपूर्ण आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून अपघात वाढण्याची शक्यता आहे. या मार्गावरून नागरिकांना वाहन काढणे कठीण होणार आहे. याशिवाय लगतच्या वस्त्यांमधून नागरिकांना रस्त्यावर येणे कठीण होऊन ये-जा बंद होणार आहे.

 

टॅग्स :Metroमेट्रोCorruptionभ्रष्टाचार