शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Nagpur; आदिवासी जिल्ह्यांत तीन ते पाच पटीने वाढली मृत्यूसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 07:00 IST

Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका विदर्भातील आदिवासीबहुल जिल्ह्यांना बसला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या तीन ते पाच पटीने वाढली.

ठळक मुद्दे विदर्भात दुसऱ्या लाटेचा प्रकोप अमरावती वगळता गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यूदर वाढला

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका विदर्भातील आदिवासीबहुल जिल्ह्यांना बसला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या तीन ते पाच पटीने वाढली. अमरावती जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३९६, दुसऱ्या लाटेत ९९४, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत १०२, दुसऱ्या लाटेत ६०२, गोंदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेत १९८, दुसऱ्या लाटेत ४८२ तर, चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत १९८ व दुसऱ्या लाटेत ४८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, अमरावती जिल्हा वगळता इतर तीन जिल्ह्यात मृत्यूदरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये प्रचंड दहशत होती. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी होते. कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळून आला. सात महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर २०२० दरम्यान रुग्ण कमी व्हायला लागले. मात्र फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्ण वाढायला लागले. ही दुसरी लाट असल्याचे शासनाने मार्च महिन्यात घोषणा केली. एप्रिल महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने जुने सर्व विक्रम मोडित निघाले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वच जिल्ह्यात दुसरी लाट ओसरताना दिसून येत आहे. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

- अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत १.१३ टक्के मृत्यू

अमरावती जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत १९,०६८ रुग्ण आढळून आले तर, ३९६ रुग्णांचे जीव गेले. मृत्यूचा दर २.०७ टक्के एवढा होता. दुसऱ्या लाटेत म्हणजे जानेवारी ते २५ मे २०२१ पर्यंत ७०,४७९ रुग्णांची नोंद झाली असताना, ९९४ रुग्णांचे मृत्यू झाले. पहिल्या लाटेच्या तुलनेत जवळपास तिपटीने मृत्यूची संख्या वाढली. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी असून, ते १.१३ टक्के आहे.

- गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ३ टक्के मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत ९,०२० रुग्ण व १०२ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर १.१३ टक्के होता. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत १० हजाराने वाढ होऊन १९,९६९ तर, मृत्यूची संख्या पाच पटीने वाढून ६०२ झाली. मृत्यूचा दर वाढून ३.०१ टक्क्यांवर गेला. येथील जिल्हा शल्य चिकित्सकानुसार जवळपास १५ टक्क्याहून अधिक मृत्यू हे जिल्हाबाहेरील आहेत.

- गोंदिया जिल्ह्यात १.८१ टक्के मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेत १३,७३० रुग्ण आढळून आले व १९८ रुग्णांचे बळी गेले. मृत्यूदर १.४४ टक्के होता. दुसऱ्या लाटेत दुपटीने रुग्ण वाढून रुग्णांची संख्या २६,५४० वर पोहचली, तर ४८२ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचे प्रमाण वाढून १.८१ टक्क्यावर पोहचले आहे.

- चंद्रपूर जिल्ह्यात १.७४ टक्के मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत २२,३०८ रुग्ण व ३६६ मृत्यू झाले. मृत्यूदर १.६४ टक्के होता. परंतु दुसऱ्या लाटेत जवळपास चार पटीने रुग्ण व सहा पटीने मृत्यू वाढले. ५९,२०४ रुग्ण व १,०३३ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूदरही वाढून तो १.७४ टक्के झाला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस