शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Coronavirus in Nagpur; आदिवासी जिल्ह्यांत तीन ते पाच पटीने वाढली मृत्यूसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 07:00 IST

Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका विदर्भातील आदिवासीबहुल जिल्ह्यांना बसला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या तीन ते पाच पटीने वाढली.

ठळक मुद्दे विदर्भात दुसऱ्या लाटेचा प्रकोप अमरावती वगळता गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात मृत्यूदर वाढला

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका विदर्भातील आदिवासीबहुल जिल्ह्यांना बसला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या तीन ते पाच पटीने वाढली. अमरावती जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३९६, दुसऱ्या लाटेत ९९४, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत १०२, दुसऱ्या लाटेत ६०२, गोंदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेत १९८, दुसऱ्या लाटेत ४८२ तर, चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत १९८ व दुसऱ्या लाटेत ४८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, अमरावती जिल्हा वगळता इतर तीन जिल्ह्यात मृत्यूदरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये प्रचंड दहशत होती. मात्र मृत्यूचे प्रमाण कमी होते. कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये आढळून आला. सात महिन्यानंतर म्हणजे ऑक्टोबर २०२० दरम्यान रुग्ण कमी व्हायला लागले. मात्र फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्ण वाढायला लागले. ही दुसरी लाट असल्याचे शासनाने मार्च महिन्यात घोषणा केली. एप्रिल महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येने जुने सर्व विक्रम मोडित निघाले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वच जिल्ह्यात दुसरी लाट ओसरताना दिसून येत आहे. परंतु दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

- अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत १.१३ टक्के मृत्यू

अमरावती जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत १९,०६८ रुग्ण आढळून आले तर, ३९६ रुग्णांचे जीव गेले. मृत्यूचा दर २.०७ टक्के एवढा होता. दुसऱ्या लाटेत म्हणजे जानेवारी ते २५ मे २०२१ पर्यंत ७०,४७९ रुग्णांची नोंद झाली असताना, ९९४ रुग्णांचे मृत्यू झाले. पहिल्या लाटेच्या तुलनेत जवळपास तिपटीने मृत्यूची संख्या वाढली. मात्र, मृत्यूचे प्रमाण कमी असून, ते १.१३ टक्के आहे.

- गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत ३ टक्के मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या लाटेत ९,०२० रुग्ण व १०२ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर १.१३ टक्के होता. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत १० हजाराने वाढ होऊन १९,९६९ तर, मृत्यूची संख्या पाच पटीने वाढून ६०२ झाली. मृत्यूचा दर वाढून ३.०१ टक्क्यांवर गेला. येथील जिल्हा शल्य चिकित्सकानुसार जवळपास १५ टक्क्याहून अधिक मृत्यू हे जिल्हाबाहेरील आहेत.

- गोंदिया जिल्ह्यात १.८१ टक्के मृत्यू

गोंदिया जिल्ह्यात पहिल्या लाटेत १३,७३० रुग्ण आढळून आले व १९८ रुग्णांचे बळी गेले. मृत्यूदर १.४४ टक्के होता. दुसऱ्या लाटेत दुपटीने रुग्ण वाढून रुग्णांची संख्या २६,५४० वर पोहचली, तर ४८२ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचे प्रमाण वाढून १.८१ टक्क्यावर पोहचले आहे.

- चंद्रपूर जिल्ह्यात १.७४ टक्के मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या लाटेत २२,३०८ रुग्ण व ३६६ मृत्यू झाले. मृत्यूदर १.६४ टक्के होता. परंतु दुसऱ्या लाटेत जवळपास चार पटीने रुग्ण व सहा पटीने मृत्यू वाढले. ५९,२०४ रुग्ण व १,०३३ मृत्यूची नोंद झाली. मृत्यूदरही वाढून तो १.७४ टक्के झाला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस