शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कोरोनाबाधितांचे मृत्यूसत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST

काटोल / नरखेड / कळमेश्वर/ उमरेड/ कुही / रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू ...

काटोल / नरखेड / कळमेश्वर/ उमरेड/ कुही / रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधावारी ३८ रुग्णांचा मृत्यू झाला तर २,४३४ नव्या रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत १५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काटोल तालुक्यात ३९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४१ जणांना कोरानाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यात ७९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ५८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७०७ तर शहरातील ३०४ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात ५०, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (२), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (३) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात तीन रुग्णांची नोंद झाली.

कळमेश्वर तालुक्यात २२१ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ७८ तर ग्रामीण भागातील १४३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मोहपा व तिष्ठी (बु) येथे सर्वाधिक १६ रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात ५३ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील ११ तर ग्रामीण भागातील ४२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४६१९ झाली आहे. यातील २४२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. सध्या २१९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

उमरेड तालुक्यात ९७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ६५ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील मृत्यूसंख्या ८२ झाली आहे. यामध्ये शहरातील ५३ तर ग्रामीण भागातील २९ जणांचा समावेश आहे.

हिंगणा तालुक्यात १९३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरीत येथील २४, हिंगणा १०, इसासनी व नीलडोह येथील प्रत्येकी ४, सालई दाभा, गुमगाव, गौराळा व डिगडोह येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९,३७० झाली आहे. यातील ५,८९४ रुग्ण बरे झाले आहेत तर १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कुही तालुक्यात विविध चाचणी केंद्रांवर २८८ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात ४९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यात मांढळ येथे २८, कुही व चिपडी येथे प्रत्येकी एक, वेलतूर (२), साळवा (४) व तितूर येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.

२६२८ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी २६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ग्रामीण भागात आतापर्यंत ८७,९३० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५९,०५४ रुग्ण उपाचारांती बरे झाले आहे. सध्या ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७,८०३ इतकी आहे.