शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

कोरोनाबाधितांचे मृत्यूसत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:08 IST

काटोल / नरखेड / कळमेश्वर/ उमरेड/ कुही / रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू ...

काटोल / नरखेड / कळमेश्वर/ उमरेड/ कुही / रामटेक/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधावारी ३८ रुग्णांचा मृत्यू झाला तर २,४३४ नव्या रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागात आतापर्यंत १५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काटोल तालुक्यात ३९६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४१ जणांना कोरानाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात काटोल शहरातील ३९ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. नरखेड तालुक्यात ७९ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ५८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७०७ तर शहरातील ३०४ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात ५०, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (२), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (३) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात तीन रुग्णांची नोंद झाली.

कळमेश्वर तालुक्यात २२१ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ७८ तर ग्रामीण भागातील १४३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात मोहपा व तिष्ठी (बु) येथे सर्वाधिक १६ रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात ५३ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील ११ तर ग्रामीण भागातील ४२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४६१९ झाली आहे. यातील २४२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. सध्या २१९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

उमरेड तालुक्यात ९७ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ६५ तर ग्रामीण भागातील ३२ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील मृत्यूसंख्या ८२ झाली आहे. यामध्ये शहरातील ५३ तर ग्रामीण भागातील २९ जणांचा समावेश आहे.

हिंगणा तालुक्यात १९३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरीत येथील २४, हिंगणा १०, इसासनी व नीलडोह येथील प्रत्येकी ४, सालई दाभा, गुमगाव, गौराळा व डिगडोह येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९,३७० झाली आहे. यातील ५,८९४ रुग्ण बरे झाले आहेत तर १८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कुही तालुक्यात विविध चाचणी केंद्रांवर २८८ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात ४९ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. यात मांढळ येथे २८, कुही व चिपडी येथे प्रत्येकी एक, वेलतूर (२), साळवा (४) व तितूर येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.

२६२८ रुग्ण कोरोनामुक्त

जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी २६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ग्रामीण भागात आतापर्यंत ८७,९३० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५९,०५४ रुग्ण उपाचारांती बरे झाले आहे. सध्या ग्रामीण भागात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २७,८०३ इतकी आहे.