शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 09:09 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे.

ठळक मुद्देगावकरी जपत आहेत ‘सोशल डिस्टन्सिंग’शेतीच्या कामाचेही सुयोग्य नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. त्याउलट शहरात मुजोर घटकांकडून कायद्याला आणि सामाजिक जबाबदारीला हरताळ फासण्यात येत आहे.जगभरात दरदिवसाला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि मृतांची संख्याही दरदिवस दुपटीने वाढत असल्याचे दृश्य आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले असून, त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारांनी संकटपूर्व पाऊल उचलले आहे. त्याला सर्वस्तरातून उत्तम प्रतिसादही लाभत आहे. डॉक्टर, पोलीस, सैनिक, स्वच्छता दूत, पत्रकार मंडळी अशा संकटाच्या परिस्थितीतही संयमाने आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. पण काही रिकामटेकडे आणि धर्मांध लोकांना कोरोनाच्या संसर्गाची मुळीच धास्ती दिसत नसल्याने, शहरात पोलिसांना त्यांच्यामागे बरीच धावपळ करावी लागत आहे. मात्र, त्याउलट गावांत प्रचंड शांतता दिसून येत आहे. शहराच्या शेजारच्या भागातील गावांमध्ये फेरफटका मारला असता गावकरी कायद्याचे मन:पूर्वक पालन करत आहे. एप्रिल हा महिना पाऊसपूर्व कामांच्या लगबगीचा असतो. त्यामुळे, वखरणी, पराटी उपटणे आदी कामे या काळात मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेला लॉकडाऊन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे गावकरी मानत असल्याचे दिसून येते. सुराबर्डी, वडधामना, गोंडखैरी, काटोल मार्गावरील ब्राह्मणवाडा या भागात नागरिक आपली शेतीविषयक कामे वगळता दिवसभर सोशल डिस्टन्सिंग जपत आहेत. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ६ अशी दिवसाला मोजून चार तास शेतीची कामे केली जात असून, शेतमजूरांना लागलीच सोडले जात आहे. शिवाय, ही कामे करताना मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. बाकीचा वेळ घरी आराम करणे आणि टीव्हीवर कोरोनाबाबतच्या बातम्यांचा आढावा घेण्यावर वेळ जात असल्याचे चित्र आहे.जनावरांना मोकळे सोडता येत नाही! - गिरीधर शेडामे: आम्ही सगळे गावकरी लॉकडाऊन पाळत आहोत. घराच्या बाहेर कुणी निघतही नाही. दिवसभर टीव्ही आणि कोरोनाच्या बातम्या यातच वेळ घालवतो आहोत. सकाळी व संध्याकाळी मात्र शेतीची कामे करावी लागतात. पिकांची कापणी आणि विक्री झाल्यावर पावसाळ्यापूर्वीची सगळी कामे उरकली जात आहेत. जनावरांकडे लक्ष पुरवावे लागते. त्यांचा चारा, पाणी करून परतावे लागत आहेत. वेळेअभावी अनेक कामेही रखडली आहेत. पण, सुरक्षा महत्त्वाची असल्याची भावना खडगाव, सावली येथील शेतकरी गिरीशर शेडामे यांनी व्यक्त केली.आम्ही गावकरी खंबीर! - लीलाधर डेहनकर: आम्ही गावकरी अगदी खंबीर आहोत. एका गावचा माणूस दुसºया गावी जात नाही किंवा येऊही दिल्या जात नाही. दुकाने, गाव पूर्णपणे बंद आहे. सध्या शेतात वखरणी व पराटी काढणे सुरू आहे. जूनच्या आधी हे काढणे गरजेचे आहे म्हणून शेतात सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास मजुरांसोबत काम करावे लागत आहे. काम करतानाही डिस्टन्सिंग पाळले जात असल्याचे माहुरझरी जवळील ब्राह्मणवाडा येथील शेतकरी लीलाधर डेहनकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस