शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 09:09 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे.

ठळक मुद्देगावकरी जपत आहेत ‘सोशल डिस्टन्सिंग’शेतीच्या कामाचेही सुयोग्य नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. त्याउलट शहरात मुजोर घटकांकडून कायद्याला आणि सामाजिक जबाबदारीला हरताळ फासण्यात येत आहे.जगभरात दरदिवसाला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि मृतांची संख्याही दरदिवस दुपटीने वाढत असल्याचे दृश्य आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले असून, त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारांनी संकटपूर्व पाऊल उचलले आहे. त्याला सर्वस्तरातून उत्तम प्रतिसादही लाभत आहे. डॉक्टर, पोलीस, सैनिक, स्वच्छता दूत, पत्रकार मंडळी अशा संकटाच्या परिस्थितीतही संयमाने आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. पण काही रिकामटेकडे आणि धर्मांध लोकांना कोरोनाच्या संसर्गाची मुळीच धास्ती दिसत नसल्याने, शहरात पोलिसांना त्यांच्यामागे बरीच धावपळ करावी लागत आहे. मात्र, त्याउलट गावांत प्रचंड शांतता दिसून येत आहे. शहराच्या शेजारच्या भागातील गावांमध्ये फेरफटका मारला असता गावकरी कायद्याचे मन:पूर्वक पालन करत आहे. एप्रिल हा महिना पाऊसपूर्व कामांच्या लगबगीचा असतो. त्यामुळे, वखरणी, पराटी उपटणे आदी कामे या काळात मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेला लॉकडाऊन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे गावकरी मानत असल्याचे दिसून येते. सुराबर्डी, वडधामना, गोंडखैरी, काटोल मार्गावरील ब्राह्मणवाडा या भागात नागरिक आपली शेतीविषयक कामे वगळता दिवसभर सोशल डिस्टन्सिंग जपत आहेत. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ६ अशी दिवसाला मोजून चार तास शेतीची कामे केली जात असून, शेतमजूरांना लागलीच सोडले जात आहे. शिवाय, ही कामे करताना मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. बाकीचा वेळ घरी आराम करणे आणि टीव्हीवर कोरोनाबाबतच्या बातम्यांचा आढावा घेण्यावर वेळ जात असल्याचे चित्र आहे.जनावरांना मोकळे सोडता येत नाही! - गिरीधर शेडामे: आम्ही सगळे गावकरी लॉकडाऊन पाळत आहोत. घराच्या बाहेर कुणी निघतही नाही. दिवसभर टीव्ही आणि कोरोनाच्या बातम्या यातच वेळ घालवतो आहोत. सकाळी व संध्याकाळी मात्र शेतीची कामे करावी लागतात. पिकांची कापणी आणि विक्री झाल्यावर पावसाळ्यापूर्वीची सगळी कामे उरकली जात आहेत. जनावरांकडे लक्ष पुरवावे लागते. त्यांचा चारा, पाणी करून परतावे लागत आहेत. वेळेअभावी अनेक कामेही रखडली आहेत. पण, सुरक्षा महत्त्वाची असल्याची भावना खडगाव, सावली येथील शेतकरी गिरीशर शेडामे यांनी व्यक्त केली.आम्ही गावकरी खंबीर! - लीलाधर डेहनकर: आम्ही गावकरी अगदी खंबीर आहोत. एका गावचा माणूस दुसºया गावी जात नाही किंवा येऊही दिल्या जात नाही. दुकाने, गाव पूर्णपणे बंद आहे. सध्या शेतात वखरणी व पराटी काढणे सुरू आहे. जूनच्या आधी हे काढणे गरजेचे आहे म्हणून शेतात सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास मजुरांसोबत काम करावे लागत आहे. काम करतानाही डिस्टन्सिंग पाळले जात असल्याचे माहुरझरी जवळील ब्राह्मणवाडा येथील शेतकरी लीलाधर डेहनकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस