शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 09:09 IST

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे.

ठळक मुद्देगावकरी जपत आहेत ‘सोशल डिस्टन्सिंग’शेतीच्या कामाचेही सुयोग्य नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. त्याउलट शहरात मुजोर घटकांकडून कायद्याला आणि सामाजिक जबाबदारीला हरताळ फासण्यात येत आहे.जगभरात दरदिवसाला कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि मृतांची संख्याही दरदिवस दुपटीने वाढत असल्याचे दृश्य आहे. भारतातही कोरोनाने पाय पसरले असून, त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारांनी संकटपूर्व पाऊल उचलले आहे. त्याला सर्वस्तरातून उत्तम प्रतिसादही लाभत आहे. डॉक्टर, पोलीस, सैनिक, स्वच्छता दूत, पत्रकार मंडळी अशा संकटाच्या परिस्थितीतही संयमाने आपली कर्तव्ये पार पाडत आहेत. पण काही रिकामटेकडे आणि धर्मांध लोकांना कोरोनाच्या संसर्गाची मुळीच धास्ती दिसत नसल्याने, शहरात पोलिसांना त्यांच्यामागे बरीच धावपळ करावी लागत आहे. मात्र, त्याउलट गावांत प्रचंड शांतता दिसून येत आहे. शहराच्या शेजारच्या भागातील गावांमध्ये फेरफटका मारला असता गावकरी कायद्याचे मन:पूर्वक पालन करत आहे. एप्रिल हा महिना पाऊसपूर्व कामांच्या लगबगीचा असतो. त्यामुळे, वखरणी, पराटी उपटणे आदी कामे या काळात मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेला लॉकडाऊन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचे गावकरी मानत असल्याचे दिसून येते. सुराबर्डी, वडधामना, गोंडखैरी, काटोल मार्गावरील ब्राह्मणवाडा या भागात नागरिक आपली शेतीविषयक कामे वगळता दिवसभर सोशल डिस्टन्सिंग जपत आहेत. सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ६ अशी दिवसाला मोजून चार तास शेतीची कामे केली जात असून, शेतमजूरांना लागलीच सोडले जात आहे. शिवाय, ही कामे करताना मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. बाकीचा वेळ घरी आराम करणे आणि टीव्हीवर कोरोनाबाबतच्या बातम्यांचा आढावा घेण्यावर वेळ जात असल्याचे चित्र आहे.जनावरांना मोकळे सोडता येत नाही! - गिरीधर शेडामे: आम्ही सगळे गावकरी लॉकडाऊन पाळत आहोत. घराच्या बाहेर कुणी निघतही नाही. दिवसभर टीव्ही आणि कोरोनाच्या बातम्या यातच वेळ घालवतो आहोत. सकाळी व संध्याकाळी मात्र शेतीची कामे करावी लागतात. पिकांची कापणी आणि विक्री झाल्यावर पावसाळ्यापूर्वीची सगळी कामे उरकली जात आहेत. जनावरांकडे लक्ष पुरवावे लागते. त्यांचा चारा, पाणी करून परतावे लागत आहेत. वेळेअभावी अनेक कामेही रखडली आहेत. पण, सुरक्षा महत्त्वाची असल्याची भावना खडगाव, सावली येथील शेतकरी गिरीशर शेडामे यांनी व्यक्त केली.आम्ही गावकरी खंबीर! - लीलाधर डेहनकर: आम्ही गावकरी अगदी खंबीर आहोत. एका गावचा माणूस दुसºया गावी जात नाही किंवा येऊही दिल्या जात नाही. दुकाने, गाव पूर्णपणे बंद आहे. सध्या शेतात वखरणी व पराटी काढणे सुरू आहे. जूनच्या आधी हे काढणे गरजेचे आहे म्हणून शेतात सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास मजुरांसोबत काम करावे लागत आहे. काम करतानाही डिस्टन्सिंग पाळले जात असल्याचे माहुरझरी जवळील ब्राह्मणवाडा येथील शेतकरी लीलाधर डेहनकर यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस