शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 21:32 IST

Corona virus, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

ठळक मुद्दे९७१ रुग्ण, ३० मृत्यू : ग्रामीणच्या तुलनेत जिल्ह्याबाहेरील मृत्यू अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

एप्रिल महिन्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले होते. शासकीयसह खासगी रुग्णालयांतील खाटांच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनही अडचणीत आले होते. या महिन्यात रोज ६ ते ७ हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत होते. २४ एप्रिल रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. ७९९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. चिंतेचे वातावरण असताना २ मेपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. मागील १७ दिवसांत वेगाने रुग्णसंख्या कमी झाली. २ मार्च रोजी ९९५ रुग्णांच्या संख्येनंतर आज पहिल्यांदाच रुग्णसंख्या हजाराखाली आली. मात्र रुग्णसंख्येसोबतच चाचण्यांच्या संख्येतही घट आली आहे. सोमवारी १३,२६१ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीचा दर ७.३२ टक्के तर, मृत्यूदर १.८४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९२ टक्क्यांवर गेला आहे.

शहरात ४८७ तर, ग्रामीणमध्ये ४७४ रुग्ण

शहरात आज ९,८१८ चाचण्या झाल्या. यातून ४८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर, ग्रामीणमध्ये ३,४४३ चाचण्यामधून ४७४ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. यावरून ग्रामीणमध्ये कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत शहरात ३,२६,२४४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये १,३६,५२९ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्याबाहेरील रुग्ण व मृत्यू रोखणार कोण?

शनिवारी शहरात ११, ग्रामीणमध्ये ९ तर जिल्हाबाहेर याच्या अधिक, १० रुग्णांचे बळी गेले आहेत. शहरात आतापर्यंत ५,१३७, ग्रामीणमध्ये २,१८४ तर जिल्ह्याबाहेरील १२५९ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू रोखणार कोण, हा प्रश्न आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांकडून प्रादुर्भाव पसरण्याचा सर्वाधिक धोका राहत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या

१५ फेब्रुवारी ४९८

२८ फेब्रुवारी ८९९

१५ मार्च २२९७

२८ मार्च ३९७०

११ एप्रिल ७२०१

२४ एप्रिल ७९९९

-अशी झाली कमी रुग्णसंख्या

२ मे ५००७

५ मे ४३९९

८ मे ३८२७

११ मे २२४३

१४ मे १९९६

१७ मे ९७१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर