शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 21:32 IST

Corona virus, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

ठळक मुद्दे९७१ रुग्ण, ३० मृत्यू : ग्रामीणच्या तुलनेत जिल्ह्याबाहेरील मृत्यू अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

एप्रिल महिन्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले होते. शासकीयसह खासगी रुग्णालयांतील खाटांच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनही अडचणीत आले होते. या महिन्यात रोज ६ ते ७ हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत होते. २४ एप्रिल रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. ७९९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. चिंतेचे वातावरण असताना २ मेपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. मागील १७ दिवसांत वेगाने रुग्णसंख्या कमी झाली. २ मार्च रोजी ९९५ रुग्णांच्या संख्येनंतर आज पहिल्यांदाच रुग्णसंख्या हजाराखाली आली. मात्र रुग्णसंख्येसोबतच चाचण्यांच्या संख्येतही घट आली आहे. सोमवारी १३,२६१ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीचा दर ७.३२ टक्के तर, मृत्यूदर १.८४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९२ टक्क्यांवर गेला आहे.

शहरात ४८७ तर, ग्रामीणमध्ये ४७४ रुग्ण

शहरात आज ९,८१८ चाचण्या झाल्या. यातून ४८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर, ग्रामीणमध्ये ३,४४३ चाचण्यामधून ४७४ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. यावरून ग्रामीणमध्ये कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत शहरात ३,२६,२४४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये १,३६,५२९ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्याबाहेरील रुग्ण व मृत्यू रोखणार कोण?

शनिवारी शहरात ११, ग्रामीणमध्ये ९ तर जिल्हाबाहेर याच्या अधिक, १० रुग्णांचे बळी गेले आहेत. शहरात आतापर्यंत ५,१३७, ग्रामीणमध्ये २,१८४ तर जिल्ह्याबाहेरील १२५९ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू रोखणार कोण, हा प्रश्न आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांकडून प्रादुर्भाव पसरण्याचा सर्वाधिक धोका राहत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या

१५ फेब्रुवारी ४९८

२८ फेब्रुवारी ८९९

१५ मार्च २२९७

२८ मार्च ३९७०

११ एप्रिल ७२०१

२४ एप्रिल ७९९९

-अशी झाली कमी रुग्णसंख्या

२ मे ५००७

५ मे ४३९९

८ मे ३८२७

११ मे २२४३

१४ मे १९९६

१७ मे ९७१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर