शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 21:32 IST

Corona virus, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

ठळक मुद्दे९७१ रुग्ण, ३० मृत्यू : ग्रामीणच्या तुलनेत जिल्ह्याबाहेरील मृत्यू अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

एप्रिल महिन्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले होते. शासकीयसह खासगी रुग्णालयांतील खाटांच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनही अडचणीत आले होते. या महिन्यात रोज ६ ते ७ हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत होते. २४ एप्रिल रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. ७९९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. चिंतेचे वातावरण असताना २ मेपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. मागील १७ दिवसांत वेगाने रुग्णसंख्या कमी झाली. २ मार्च रोजी ९९५ रुग्णांच्या संख्येनंतर आज पहिल्यांदाच रुग्णसंख्या हजाराखाली आली. मात्र रुग्णसंख्येसोबतच चाचण्यांच्या संख्येतही घट आली आहे. सोमवारी १३,२६१ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीचा दर ७.३२ टक्के तर, मृत्यूदर १.८४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९२ टक्क्यांवर गेला आहे.

शहरात ४८७ तर, ग्रामीणमध्ये ४७४ रुग्ण

शहरात आज ९,८१८ चाचण्या झाल्या. यातून ४८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर, ग्रामीणमध्ये ३,४४३ चाचण्यामधून ४७४ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. यावरून ग्रामीणमध्ये कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत शहरात ३,२६,२४४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये १,३६,५२९ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्याबाहेरील रुग्ण व मृत्यू रोखणार कोण?

शनिवारी शहरात ११, ग्रामीणमध्ये ९ तर जिल्हाबाहेर याच्या अधिक, १० रुग्णांचे बळी गेले आहेत. शहरात आतापर्यंत ५,१३७, ग्रामीणमध्ये २,१८४ तर जिल्ह्याबाहेरील १२५९ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू रोखणार कोण, हा प्रश्न आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांकडून प्रादुर्भाव पसरण्याचा सर्वाधिक धोका राहत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या

१५ फेब्रुवारी ४९८

२८ फेब्रुवारी ८९९

१५ मार्च २२९७

२८ मार्च ३९७०

११ एप्रिल ७२०१

२४ एप्रिल ७९९९

-अशी झाली कमी रुग्णसंख्या

२ मे ५००७

५ मे ४३९९

८ मे ३८२७

११ मे २२४३

१४ मे १९९६

१७ मे ९७१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर