शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १५ दिवसात कोरोनाचे ७०२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 23:22 IST

कोरोनाचा वाढता मृत्यूदर ही चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या १५ दिवसात ७०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे भीतीचे संकट आणखीच गडद झाले आहे. दुसरीकडे नवीन रुग्णांचीही दररोज मोठी भर पडत आहे. मंगळवारी १९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४८ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५५४३० झाली असून मृतांची संख्या १७५३ वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे१९५७ नवे रुग्ण, ४८ मृत्यूची भर : शहरात १७०५ तर ग्रामीणमध्ये २४६ पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा वाढता मृत्यूदर ही चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या १५ दिवसात ७०२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे भीतीचे संकट आणखीच गडद झाले आहे. दुसरीकडे नवीन रुग्णांचीही दररोज मोठी भर पडत आहे. मंगळवारी १९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर ४८ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ५५४३० झाली असून मृतांची संख्या १७५३ वर पोहचली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर ३.१६ टक्के आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची दहशत कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आज शहरात १७०५, ग्रामीणमध्ये २४६ तर जिल्हाबाहेर सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत शहरात एकूण रुग्णांची संख्या ४३९६२ झाली आहे. ग्रामीणमध्ये १११२९ तर जिल्हाबाहेर ३३९ रुग्णांची नोंद आहे. आज आरटीपीसीआरच्या ३३८७ तर रॅपिड अ‍ॅन्टिजनच्या २९३४ असे एकूण ६३२१ चाचण्या झाल्या. रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीतून ६९५ रुग्ण पॉझटिव्ह आले व २२३९ रुग्ण निगेटिव्ह आले, तर आरटीपीसीआर चाचणीतून १२५२ रुग्णांची नोंद झाली व २०३१ रुग्ण निगेटिव्ह आले.शहरात १३२१ तर ग्रामीणमध्ये २७५ मृत्यूआज जिल्हात नोंद झालेल्या मृतांमध्ये शहरातील २९, ग्रामीण भागातील १३ तर जिल्हाबाहेरील सहा मृत्यू आहे. एकूण मृतांमध्ये शहरातील १३२१, ग्रामीणमधील २७५ तर जिल्ह्याबाहेरील १५७ आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने भीतीचे वातावरण आहे. मृतांमध्ये सर्व वयोगटातील रुग्ण असलेतरी ५० ते ७० या वयोगटातील सर्वाधिक आहेत. वाढते वय, जुनाट अनियंत्रित आजार आणि रुग्णालयात पोहचण्यास उशीर, हे तीन कारण मृत्यूची संख्या वाढवित असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.बरे होण्याचे प्रमाण ४६ वरून ७६ टक्क्यांवरएकीकडे रुग्ण व मृत्यूची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण ७६.३७ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, १६ आॅगस्ट रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी, ४६.७४ टक्क्यांवर होते. यामुळे आरोग्य यंत्रणेसाठी ही दिलासादायक बाब आहे. आज १६६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण ४२३३३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ११३४४ रुग्ण उपचाराखाली आहेत.- शासकीयमध्ये १७२३ तर खासगीमध्ये १५७० चाचण्या शासनाच्या पाच प्रयोगशाळामिळून आज १७२३ तर खासगी लॅबमध्ये १५७० रुग्णांच्या चाचण्या झाल्या. धक्कादायक म्हणजे, शासकीय प्रयोगशाळेतील रोजच्या चाचण्यांची क्षमता २५००वर आहे. तरीही कमी तपासण्या होत आहे तर, खासगीची क्षमता याच्या तुलनेत निम्मी असताना सर्वाधिक चाचण्या होत आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत १५५, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ६१९, मेयोच्या प्रयोगशाळेत १४५, नीरीच्या प्रयोगशाळेत १८३ तपासण्या झाल्या.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६२२७बाधित रुग्ण : ५५४३०बरे झालेले : ४२३३३उपचार घेत असलेले रुग्ण : ११३४४मृत्यू :१७५३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू