शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

Corona virus : नागपुरातही बार, रेस्टॉरेंट, पानठेले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 20:47 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा-मनपा प्रशासनाचा स्वागतार्ह निर्णय : लोकमतच्या जनहितार्थ मोहिमेला यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लोकांची गर्दी कमी करणे अत्यावश्यक आहे. लोकांचा कमीत कमी संपर्क यावा व शक्यतोवर लोकांनी घरीच राहावे, यासाठी आज बुधवारी जिल्हा व मनपा प्रशासनाने स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ आजाराबाबत नागपूर जिल्ह्यात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. जगातील इतर देशांतील अनुभव लक्षात घेता कोरोना विषाणूचा संसर्ग चक्राकार पद्धतीने पसरतो. या अनुभवाच्या आधारे विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी व्यक्तींमध्ये भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क यावा व शक्यतो घरात राहणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३० (२) (५) व (१८) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून उपरोक्त आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या धर्तीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनीसुद्धा शहरातील गर्दी कमी करण्यासाठी शहरातील सर्व शॉपिंग मॉल, दुकाने व आस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. परंतु अत्यावश्यक किराणा सामान, दूध, व भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू व औषधालय यातून वगळण्यात आले आहेत.लग्न समारंभ व कौटुंबिक सोहळेही टाळामनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी आदेश जारी करीत शहरातील सर्व मंगल कार्यालये, सभागृहे, बॅन्क्वेट हॉल, क्लबधारकांना असे निर्देश दिले आहेत की, लग्न कार्य किंवा कौटुंबिक कार्यक्रम शक्यतोवर रद्द करावे किंवा पुढे ढकलावे. असे लग्न व इतर कार्यक्रम अत्यावश्यक असल्यास शक्यतोवर ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही, याकरिता योग्य उपाययोजना कराव्यात. कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही त्याकरिता सर्व आवश्यक ती दक्षता व खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.हे राहणार बंदसर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम, बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूची दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पानठेले, शॉपिंग मॉल, दुकाने, आस्थापना आदीहे राहणार सुरूअत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, औषधालयशहरात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू आहे. तेव्हा नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आपली काळजी घ्यावी. शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. जास्तीत जास्त घरीच राहावे.रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारीनागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी लग्न समारंभ व इतर कौटुंबिक समारंभ आयोजित करणे व इतरांच्या कार्यक्रमास जाणे टाळावे.तुकाराम मुंढे, मनपा आयुक्तशहरात जमाव बंदी कायदा लागू करण्यात आला आहे. तेव्हा लोकांनी गर्दी करू नये. शक्यतोवर घरीच राहावे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास कारवाई होईल, तेव्हा सहकार्य करावे.डॉ. भूषणकुमार उपाध्यायपोलीस आयुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShoppingखरेदीnagpurनागपूर