शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

कोरोनामुळे आईस्क्रीम उद्योग ठप्प : ३५० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:39 IST

कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० कोटींचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआईस्क्रीमविना संपूर्ण सिझन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० कोटींचे नुकसान झाले आहे. ते भरून निघणे कठीण असल्याचे मत पार्लरच्या संचालकांनी व्यक्त केले.आईस्क्रीम उद्योगाचा पीक सिझन मार्चपासून सुरू होऊन जूनच्या अखेरपर्यंत चालतो. आईस्क्रीमची मागणी वाढण्यापूर्वीच कोरोना लॉकडाऊनने ठप्प झाली. शासनाच्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद झाली. दोन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक तोटा भरून निघणे कठीण आहे. जून महिन्यातही दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षीचा गर्मीचा सिझन विक्रीविना जाणार आहे. विक्रीच नसल्यामुळे आईस्क्रीम कंपन्यांनीही उत्पादन बंद केले तर काहींनी थोडेफार सुरू ठेवले. परराज्यातील कंपन्यांच्या आईस्क्रीमची नागपुरात आवक झालीच नाही. त्याचा परिणाम असा की, आईस्क्रीम निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला मागणी नाहीच. कंपन्या बंद झाल्याने हजारो कामगार बेरोजगार झालेत. याशिवाय विक्री पार्लरमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला. या उद्योगातील सर्वच रोजगार ठप्प झाला.सिझनमध्ये होते वर्षभराची कमाईमार्च महिन्यात दहा दिवस आणि एप्रिल व मे महिन्याचा व्यवसाय ठप्प झाल्याने थोडीफार कमाई नव्हे तर आईस्क्रीम पार्लरमधील फ्रीजरच्या देखरेखीसाठी अतिरिक्त खर्च आणि विजेचे बिल भरावे लागत आहे. या व्यवसायात वर्षभराची कमाई उन्हाळ्याच्या तीन महिन्यात होते. पुढे लग्नसराई आणि समारंभ वगळता पावसाळा आणि हिवाळ्यात विक्री होणार नाही. नागपुरात ५०० पेक्षा जास्त आईस्क्रीम पार्लर आहेत. या सर्वांना नुकसान सोसावे लागत आहे. उन्हाळ्याचा सिझन पाहता कंपन्यांनी पूर्वीच कच्च्या मालाची खरेदी केली होती. तो माल खराब झाला आहे. त्याचाही फटकाही कंपन्यांना बसला आहे.बर्फ कंपन्यांना नुकसानउन्हाळ्यात आईस्क्रीमप्रमाणे बर्फ गोळ्यांनाही मागणी असते. पण यंदा ही दुकाने थाटली नाहीत. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आणि कंपन्यांनी बर्फ निर्मितीच बंद केली. लग्नसमारंभ नसल्याने मागणीच ठप्प झाली आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर निघण्यास आणखी काही महिने लागतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर