शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोनामुळे आईस्क्रीम उद्योग ठप्प : ३५० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 21:39 IST

कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० कोटींचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआईस्क्रीमविना संपूर्ण सिझन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनचा परिणाम सर्वच उद्योगधंद्यावर पडला आहे. आईस्क्रीम उद्योगही त्यातून सुटला नाही. उत्पादक कंपन्यांपासून विक्री करणाऱ्या आईस्क्रीम पार्लरपर्यंत सर्वांना आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे या उद्योगाला उन्हाळ्यात ७० टक्के अर्थात विक्रीत ३५० कोटींचे नुकसान झाले आहे. ते भरून निघणे कठीण असल्याचे मत पार्लरच्या संचालकांनी व्यक्त केले.आईस्क्रीम उद्योगाचा पीक सिझन मार्चपासून सुरू होऊन जूनच्या अखेरपर्यंत चालतो. आईस्क्रीमची मागणी वाढण्यापूर्वीच कोरोना लॉकडाऊनने ठप्प झाली. शासनाच्या आदेशानुसार सर्व दुकाने बंद झाली. दोन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक तोटा भरून निघणे कठीण आहे. जून महिन्यातही दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे यावर्षीचा गर्मीचा सिझन विक्रीविना जाणार आहे. विक्रीच नसल्यामुळे आईस्क्रीम कंपन्यांनीही उत्पादन बंद केले तर काहींनी थोडेफार सुरू ठेवले. परराज्यातील कंपन्यांच्या आईस्क्रीमची नागपुरात आवक झालीच नाही. त्याचा परिणाम असा की, आईस्क्रीम निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला मागणी नाहीच. कंपन्या बंद झाल्याने हजारो कामगार बेरोजगार झालेत. याशिवाय विक्री पार्लरमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावला. या उद्योगातील सर्वच रोजगार ठप्प झाला.सिझनमध्ये होते वर्षभराची कमाईमार्च महिन्यात दहा दिवस आणि एप्रिल व मे महिन्याचा व्यवसाय ठप्प झाल्याने थोडीफार कमाई नव्हे तर आईस्क्रीम पार्लरमधील फ्रीजरच्या देखरेखीसाठी अतिरिक्त खर्च आणि विजेचे बिल भरावे लागत आहे. या व्यवसायात वर्षभराची कमाई उन्हाळ्याच्या तीन महिन्यात होते. पुढे लग्नसराई आणि समारंभ वगळता पावसाळा आणि हिवाळ्यात विक्री होणार नाही. नागपुरात ५०० पेक्षा जास्त आईस्क्रीम पार्लर आहेत. या सर्वांना नुकसान सोसावे लागत आहे. उन्हाळ्याचा सिझन पाहता कंपन्यांनी पूर्वीच कच्च्या मालाची खरेदी केली होती. तो माल खराब झाला आहे. त्याचाही फटकाही कंपन्यांना बसला आहे.बर्फ कंपन्यांना नुकसानउन्हाळ्यात आईस्क्रीमप्रमाणे बर्फ गोळ्यांनाही मागणी असते. पण यंदा ही दुकाने थाटली नाहीत. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आणि कंपन्यांनी बर्फ निर्मितीच बंद केली. लग्नसमारंभ नसल्याने मागणीच ठप्प झाली आहे. कोरोनाच्या संकटातून बाहेर निघण्यास आणखी काही महिने लागतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर