शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कोरोनामुळे गणेशोत्सवात मिठाईची ७० टक्के विक्री घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 23:08 IST

गर्दीतून संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक निवासी सोसायट्यांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम मिठाईच्या विक्रीवर झाला असून यंदा गणेशोत्सवात लोकांची वर्दळ नसल्याने सर्वाधिक विकले जाणारे पेढे, मोदक आणि लाडूंच्या विक्रीत ७० टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे सार्वजनिक उत्सव साजरा करण्यास मनाई : उत्सव साधेपणाने साजरा

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाचा परिणाम गणेशोत्सवावर दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय गर्दीतून संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक निवासी सोसायट्यांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम मिठाईच्या विक्रीवर झाला असून यंदा गणेशोत्सवात लोकांची वर्दळ नसल्याने सर्वाधिक विकले जाणारे पेढे, मोदक आणि लाडूंच्या विक्रीत ७० टक्क्यांची घट झाल्याची माहिती आहे.हॉटेल मालक म्हणाले, कोरोनामुळे गणेशोत्सवात मिठाईची विक्री कमी होण्याच्या शक्यतेने यंदा मिठाई कमी प्रमाणात तयार केली आहे. मिठाई दुधापासून तयार होते. त्यामुळे जास्त दिवस ठेवता येत नाही. खराब झाल्याने आर्थिक नुकसान होते. यंदा ग्राहक कमी प्रमाणात येत आहेत. भक्त घरी, सोसायटी वा सार्वजनिक गणेशोत्सवात प्रसाद वाटपासाठी मिठाईची खरेदी करतात. पण यावर्षी भक्तांमध्ये उत्साह नाही. सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत असल्याने लोकांमध्ये निरुत्साह आहे. मंडळाचे पदाधिकारी सकाळी आणि सायंकाळी आरती करून मंडप पडद्याने झाकून ठेवतात. याशिवाय भक्तही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जाण्यास उत्सुक नाहीत. या सर्व कारणांमुळे मिठाईची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे यंदा हॉटेल मालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. किती कोटींचे नुकसान होईल, याची आकडेवारी उपलब्ध नाही.नागपुरात ५०० पेक्षा जास्त मिठाईची दुकाने आहेत. यंदा कोरोनामुळे हॉटेल मालकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. जास्त मिठाई तयार केली तर ती फेकावी लागेल, अशी भीती हॉटेल मालकांमध्ये आहे. यापूर्वी रक्षाबंधनसणातही मिठाई कमी प्रमाणात तयार केली होती. कच्च्या मालाचे दर वाढल्यानंतरही मिठाईचे दर वाढले नाहीत. मिठाई तयार करणारे कारागीर बाहेरगावचे असल्याने त्यांना यंदा बोलविण्यात आलेले नाही. आता हॉटेलमधील कारागीर मिठाई तयार करीत आहेत. सध्या ऑडर आल्यानंतरच मिठाई तयार करण्यात येत असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले.गणेशोत्सवात मिठाईची ३० टक्के विक्रीयंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर बॅन असल्याने भक्तांमध्ये उत्साह दिसून येत नाही. अनेक सोसायट्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या भीतीने गणेशोत्सव साजरा केला नाही. महाराष्ट्रात गणेशोत्सव आनंदाचा उत्सव आहे. दहा दिवस लोक एकत्र येतात. यंदा कोरोनामुळे उत्साह मावळला आहे. पेढे, मोदक आणि लाडूंची विक्री कमी झाली आहे. यंदा केवळ ३० टक्के विक्रीची अपेक्षा आहे.दीपक अग्रवाल, आर्य भवन, सीताबर्डी.ऑर्डरनुसार तयार होते मिठाईपूर्वी गणेशोत्सवात मिठाईचे वेगळे काऊंटर असायचे. मोदक व पेढ्यासाठी मंडळाचे ऑडर असायचे. पण यंदा स्थिती विपरीत आहे. मंडळाचे आॅर्डर नाहीत. भक्तांनीही खरेदीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे यंदा हॉटेलमध्ये वेगळे काऊंटर लावले नाही. दुधापासून तयार होणारी मिठाई खराब होत असल्याने केवळ ऑर्डरनुसार तयार करण्यात येत आहे.राम भंडार, सी. गुप्ता, नंदनवन.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवnagpurनागपूर