शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

कोरोनाचा विदर्भाला धोका नाही  : माफसूचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:24 IST

विदर्भात तापमान जास्त असते व आर्द्रता कमी असते. त्यामुळे ‘कोरोना’चे विषाणू जास्त काळ टिकूच शकणार नाही. म्हणूनच विदर्भाला या आजाराचा धोका नाही, असा दावा ‘माफसू’चे (महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठ) कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केला.

ठळक मुद्देविद्यार्थी राज्यभर जनजागृतीसाठी करणार

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : चीनमध्ये थैमान घालत असलेल्या ‘कोरोना’ या आजाराचे विषाणू हे कमी तापमान व जास्त आर्द्रतेत वाढतात. परंतु विदर्भात तापमान जास्त असते व आर्द्रता कमी असते. त्यामुळे ‘कोरोना’चे विषाणू जास्त काळ टिकूच शकणार नाही. म्हणूनच विदर्भाला या आजाराचा धोका नाही, असा दावा ‘माफसू’चे (महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठ) कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केला. ‘कोरोना’संदर्भात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.‘कोरोना’ आजाराबाबत ‘व्हॉट्सअ‍ॅप’सह विविध ‘सोशल मीडिया’वर विविध दावे करण्यात येत आहेत. परंतु हा विषाणू नेमका कुठून आला याबाबत अद्यापही ठोस संशोधन झालेले नाही. मात्र कुठलेही अन्नपदार्थ असतील तर त्यांना योग्य पद्धतीने शिजविणे आवश्यक आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीत मसाल्यांचा जास्त वापर होतो. त्यामुळे यात विषाणू किंवा जीवाणू जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे मांसाहार केल्यानंतर ‘कोरोना’चा प्रसार होतो या अफवांवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे डॉ.पातुरकर यांनी सांगितले.भारतात ‘कोरोना’ची केवळ तीनच प्रकरणे आढळून आली आहेत. परंतु या आजाराच्या नावाखाली राज्यभरातील विविध भागांत ‘कोरोना’बाबत भीती व गैरसमज पसरवले जात आहेत. यासंदर्भात ‘माफसू’कडून पुढाकार घेण्यात येईल. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्वमहाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमार्फत तसेच ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल. ‘कोरोना’बाबतचे तथ्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलसचिव चंद्रभान पराते यांच्यासह डॉ.सोमकुंवर, डॉ.व्ही.सी.इंगळे, डॉ.प्रभाकर टेंभुर्णे, डॉ.राजा दुधबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोनाVidarbhaविदर्भ