शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा विदर्भाला धोका नाही  : माफसूचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:24 IST

विदर्भात तापमान जास्त असते व आर्द्रता कमी असते. त्यामुळे ‘कोरोना’चे विषाणू जास्त काळ टिकूच शकणार नाही. म्हणूनच विदर्भाला या आजाराचा धोका नाही, असा दावा ‘माफसू’चे (महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठ) कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केला.

ठळक मुद्देविद्यार्थी राज्यभर जनजागृतीसाठी करणार

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : चीनमध्ये थैमान घालत असलेल्या ‘कोरोना’ या आजाराचे विषाणू हे कमी तापमान व जास्त आर्द्रतेत वाढतात. परंतु विदर्भात तापमान जास्त असते व आर्द्रता कमी असते. त्यामुळे ‘कोरोना’चे विषाणू जास्त काळ टिकूच शकणार नाही. म्हणूनच विदर्भाला या आजाराचा धोका नाही, असा दावा ‘माफसू’चे (महाराष्ट्र पशुवैद्यकीय व मत्स्यविज्ञान विद्यापीठ) कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर यांनी केला. ‘कोरोना’संदर्भात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.‘कोरोना’ आजाराबाबत ‘व्हॉट्सअ‍ॅप’सह विविध ‘सोशल मीडिया’वर विविध दावे करण्यात येत आहेत. परंतु हा विषाणू नेमका कुठून आला याबाबत अद्यापही ठोस संशोधन झालेले नाही. मात्र कुठलेही अन्नपदार्थ असतील तर त्यांना योग्य पद्धतीने शिजविणे आवश्यक आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीत मसाल्यांचा जास्त वापर होतो. त्यामुळे यात विषाणू किंवा जीवाणू जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे मांसाहार केल्यानंतर ‘कोरोना’चा प्रसार होतो या अफवांवर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही, असे डॉ.पातुरकर यांनी सांगितले.भारतात ‘कोरोना’ची केवळ तीनच प्रकरणे आढळून आली आहेत. परंतु या आजाराच्या नावाखाली राज्यभरातील विविध भागांत ‘कोरोना’बाबत भीती व गैरसमज पसरवले जात आहेत. यासंदर्भात ‘माफसू’कडून पुढाकार घेण्यात येईल. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या राज्यातील सर्वमहाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमार्फत तसेच ‘एनएसएस’च्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल. ‘कोरोना’बाबतचे तथ्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कुलसचिव चंद्रभान पराते यांच्यासह डॉ.सोमकुंवर, डॉ.व्ही.सी.इंगळे, डॉ.प्रभाकर टेंभुर्णे, डॉ.राजा दुधबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोनाVidarbhaविदर्भ