शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

कोरोनामुळे ग्राहक घरात ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST

नागपूर : कोरोना संक्रमणापासून स्वत:ला वाचविण्यासाठी ग्राहक घरात ‘लॉक’ झाल्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये नागपूर जिल्हा (शहर क्षेत्र) ...

नागपूर : कोरोना संक्रमणापासून स्वत:ला वाचविण्यासाठी ग्राहक घरात ‘लॉक’ झाल्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये नागपूर जिल्हा (शहर क्षेत्र) व अतिरिक्त जिल्हा (ग्रामीण क्षेत्र) ग्राहक तक्रार निवारण आयोगात कमी तक्रारी दाखल झाल्या. सदर दोन्ही आयोग मिळून ग्राहकांनी २०१९ मध्ये १०९३ तक्रारी दाखल केल्या होत्या. परंतु, २०२० मध्ये केवळ ९०१ तक्रारी दाखल करण्यात आल्या.

गेल्या वर्षी भारतामध्ये मार्च महिन्यात कोरोना रुग्ण आढळण्याला सुरुवात झाली. त्यानंतर रुग्णसंख्या सतत वाढत गेल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित करून अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित व्यवस्थेच्या चाकांना ब्रेक लावला. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने स्वत:सह इतर सर्व न्यायालयांमध्ये केवळ तातडीच्या व महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्याचे आदेश जारी केले. परिणामी, मार्चपासून जिल्हा ग्राहक आयोगात तातडीची व महत्त्वाची कामे वगळता इतर सर्व कामे थांबविण्यात आली. ग्राहकांनीही आवश्यक नसलेल्या कामासाठी घराबाहेर पडणे बंद केले. त्यामुळे नागपुरातील जिल्हा व अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी कमी प्रकरणे दाखल झाली. तसेच, प्रकरणे निकाली निघण्याची संख्याही कमी झाली. दोन्ही आयोगांनी २०१९ मध्ये २२१ प्रकरणे निकाली काढली होती. २०२० मध्ये त्यांना केवळ ३१ प्रकरणे निकाली काढता आली.

---------------

सर्वाधिक तक्रारी बिल्डरविरुद्ध

दोन्ही आयोगांमध्ये सर्वाधिक तक्रारी बिल्डर व डेव्हलपर्सनी केलेल्या फसवणुकीविरुद्ध दाखल झाल्या. या तक्रारी ६० टक्क्यांवर आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विमा दाव्यासंदर्भातील तर, तिसऱ्या क्रमांकावर बँकिंगविषयीच्या तक्रारी आहेत. या तक्रारी ७ ते ८ टक्के आहेत. याशिवाय वीज, वित्त, पर्यटन, कृषी, ऑटोमोबाईल व इतर विविध क्षेत्राशी संबंधित तक्रारीही दाखल झाल्या आहेत.

----------------

वर्षनिहाय दाखल प्रकरणे

वर्ष - जिल्हा आयोग - अतिरिक्त आयोग

२०११ - ८३९ - १३९

२०१२ - ८९१ - २२०

२०१३ - ८६३ - २०९

२०१४ - ६८६ - ३०१

२०१५ - ८५२ - ७६२

२०१६ - ८०० - १२५७

२०१७ - ६१७ - २३५

२०१८ - ७६५ - २५७

२०१९ - ७५४ - ३३९

२०२० - ६१९ - २८२

-----------------

एकूण दाखल व निकाली तक्रारी

वर्ष - दाखल - निकाली

२०१९ - १०९३ - २२१

२०२० - ९०१ - ३१

----------------

कोरोनामुळे तक्रारी कमी झाल्या

गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे ग्राहक आयोगाचे काम काही महिने बंद होते. त्यानंतर मर्यादित स्वरूपात कामकाजाला सुरुवात झाली. त्यावेळीही विविध बंधने लागू होती. त्यामुळे ग्राहक घराबाहेर पडत नव्हते. कोरोनापासून स्वत:ला वाचविण्याला सर्वांची प्राथमिकता होती. परिणामी, ग्राहक आयोगात दाखल होणाऱ्या तक्रारींची संख्या कमी झाली.

------- अविनाश प्रभुणे, सदस्य, अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग.