शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात ४४ हजारावर कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:42 IST

जिल्ह्यात (ग्रामीण भागात) आतापर्यंत ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असून, यात २७,०४५ अ‍ॅन्टीजेन टेस्ट तर १७,८९८ आरटीपीसीआर टेस्ट आहेत. यापैकी ३,३७५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी ठाकरे यांचे आवाहन : घाबरू नका तपासणी करून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात (ग्रामीण भागात) आतापर्यंत ४४ हजारावर कोरोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असून, यात २७,०४५ अ‍ॅन्टीजेन टेस्ट तर १७,८९८ आरटीपीसीआर टेस्ट आहेत. यापैकी ३,३७५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी आजवर ७२ वर मृत्यू झाले आहेत. परंतु या मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे वेळीच निदान न होणे, उशिरा तपासणी करणे आदी कारणांमुळे झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीस जर कोविड-१९ ची लक्षणे दिसून येत असल्यास त्यांनी घाबरून न जाता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी गुरुवारी केले.ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ग्रामीण भागामध्ये निरंतर सर्वे सुरू आहे. तीन स्तरावर पथक तैनात करण्यात आले आहे. ६० ते ७० घरामागे एक कर्मचारी तैनात आहे. आठ हजारावर लोक या कामात आहेत. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी ८५० सुपरवायझर आहेत. या माध्यमातून लक्षणे असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन तपासणी केली जात आहे. त्यातूनही तपासणी वाढल्या आहेत. दररोज वरिष्ठ पातळीवर या सर्व कामांची मॉनिटरिंग होत आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे कामठी शहरामध्ये आढळून आले आहेत. पूर्वी येथे नागरिक प्रशासनाला साद देत नसल्यामुळे येथील रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी, धर्मगुरू आदींना सोबत घेत जनतेला कोरोना तपासणीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात प्रत्येक तालुक्याचा दौरा करून लोकप्रतिनिधी व स्थानिक डॉक्टरांना सोबत घेऊन लोकांना आवाहन केले जात आहे.अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्वांनी मिळून त्याचा विरोध कराग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याबाबतचा चुकीचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर योग्य ती कारवाई होईलच; परंतु आपण सर्वांनी मिळून अशा अफवांचा विरोध करावा, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी ठाकरे आणि जि.प.चे सीईओ कुंभेजकर यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर