शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा उपराजधानीतील रक्तपेढ्यांंना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:32 IST

‘कोव्हीड-१९’ या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रक्तदान शिबिरे किंवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये केवळ १२५ रक्त पिशव्या रक्तदान शिबिर घेण्याचे रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोव्हीड-१९’ या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेळावे, कार्यक्रमावरही निर्बंध घातले आहे. यामुळे रक्तदान शिबिरे किंवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. मेडिकलच्या रक्तपेढीत सध्याच्या स्थितीत केवळ १२५ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. यातही रक्तगट ‘ए’ आणि ‘एबी’चा तुटवडा पडला आहे. अशीच स्थिती मेयोसह इतरही खासगी रक्तपेढ्यांमधील आहे. त्यामुळे गंभीर शस्त्रक्रियेच्या रुग्णासह, कॅन्सर, थॅलेसेमिया, हिमोफेलिया व सिकलसेलचे रुग्ण अडचणीत आले आहेत.उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी ६३३ वर खासगी रुग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाºया चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु शासनातर्फे शाळा-महाविद्यालयांना सुटी, मेळावे-कार्यक्रमावर बंदी व घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले जात असल्याने याचा प्रभाव रक्तदानावर झाला आहे. शिवाय, काही रक्तदात्यांमध्ये कोरोनाची भीती किंवा संभ्रम निर्माण झाल्याने स्वेच्छा रक्तदानही फार कमी झाले आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तपिशव्यांचा अपुरा साठा आहे. यावर उपाय म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.यात रक्तदात्यांची कोरोना विषाणूबाबतची लक्षणे व प्रवासाचा पूर्वेतिहास तपासून, सुरक्षा व स्वच्छतेचे पालन करून तसेच रक्तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करून रक्तदान शिबिर आयोजित करावे, अश सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नकारक्तदान केल्यामुळे किंवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही. यामुळे स्वेच्छा रक्तदात्यांनी रक्तदान करावे. सामाजिक संस्था, धार्मिक संस्था यांनीही पुढाकार घेऊन रक्तदाते रक्तपेढीत पाठवावे. यामुळे अपघाताच्या जखमींना, गंभीर शस्त्रक्रियेच्या रुग्णांना व कॅन्सर, थॅलेसेमिया, सिकलसेल आणि हिमोफेलियाच्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होईल.-डॉ. संजय पराते, प्रमुख, आदर्श रक्तपेढी मेडिकल

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस