शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

कोरोनाचा उपराजधानीतील रक्तपेढ्यांंना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:32 IST

‘कोव्हीड-१९’ या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रक्तदान शिबिरे किंवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे.

ठळक मुद्देमेडिकलमध्ये केवळ १२५ रक्त पिशव्या रक्तदान शिबिर घेण्याचे रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोव्हीड-१९’ या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढताच शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेळावे, कार्यक्रमावरही निर्बंध घातले आहे. यामुळे रक्तदान शिबिरे किंवा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. मेडिकलच्या रक्तपेढीत सध्याच्या स्थितीत केवळ १२५ रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. यातही रक्तगट ‘ए’ आणि ‘एबी’चा तुटवडा पडला आहे. अशीच स्थिती मेयोसह इतरही खासगी रक्तपेढ्यांमधील आहे. त्यामुळे गंभीर शस्त्रक्रियेच्या रुग्णासह, कॅन्सर, थॅलेसेमिया, हिमोफेलिया व सिकलसेलचे रुग्ण अडचणीत आले आहेत.उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यासह रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी ६३३ वर खासगी रुग्णालये आहेत. यामुळे विदर्भच नाही तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा येथून रुग्णांचा ओढा नागपूरकडे वाढला आहे. यात प्रामुख्याने गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. यांना रक्तपुरवठा करणाºया चार शासकीयसह नऊ खासगी रक्तपेढ्या आहेत. परंतु शासनातर्फे शाळा-महाविद्यालयांना सुटी, मेळावे-कार्यक्रमावर बंदी व घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले जात असल्याने याचा प्रभाव रक्तदानावर झाला आहे. शिवाय, काही रक्तदात्यांमध्ये कोरोनाची भीती किंवा संभ्रम निर्माण झाल्याने स्वेच्छा रक्तदानही फार कमी झाले आहे. शासकीयसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तपिशव्यांचा अपुरा साठा आहे. यावर उपाय म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.यात रक्तदात्यांची कोरोना विषाणूबाबतची लक्षणे व प्रवासाचा पूर्वेतिहास तपासून, सुरक्षा व स्वच्छतेचे पालन करून तसेच रक्तदानाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थित नियमन करून रक्तदान शिबिर आयोजित करावे, अश सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नकारक्तदान केल्यामुळे किंवा रक्त संक्रमणामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही. यामुळे स्वेच्छा रक्तदात्यांनी रक्तदान करावे. सामाजिक संस्था, धार्मिक संस्था यांनीही पुढाकार घेऊन रक्तदाते रक्तपेढीत पाठवावे. यामुळे अपघाताच्या जखमींना, गंभीर शस्त्रक्रियेच्या रुग्णांना व कॅन्सर, थॅलेसेमिया, सिकलसेल आणि हिमोफेलियाच्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होईल.-डॉ. संजय पराते, प्रमुख, आदर्श रक्तपेढी मेडिकल

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस