शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोरोना इफेक्ट! पौरोहित्य करणारे आर्थिक संकटाच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 06:00 IST

धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे.

ठळक मुद्देना भिक्षुकी-दक्षिणा, ना घरात अन्नाचा दाणाघरोघरी होणारे नैमित्तिक विधी स्थगित!

प्रवीण खापरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरोघरी धार्मिक अनुष्ठानांच्या माध्यमातून भक्तीचे दीप उजळविणारे भिक्षुक लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे.साधारणत: एकट्या नागपुरात पाच ते सात हजार प्रत्यक्ष पौरोहित्य करणारी मंडळी आहे. पौरोहित्यावरच ही मंडळी आपले संपूर्ण आयुष्य घालवते. मौंज, विवाह, वास्तूशांती, सत्यनारायण पूजनापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत प्रत्येकाचे पुरोहित वेगळे आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सगळेच घरातल्या घरात बंद झाले आहेत. सगळे सोहळे, अनुष्ठाने रद्द झाली आहेत. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती आणि अक्षयतृतीया यासारख्या पौरोहित्यासाठी अत्यंत महत्त्वाचे सण याच लॉकडाऊनमध्ये निघून गेले. या मुहूर्तांवर यज्ञादी अनुष्ठानांचे अत्याधिक महत्त्व असते. एप्रिल, मे आणि जून हे सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून विवाहसोहळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. ते सगळे सोहळे रद्द अथवा स्थगित झाले. या सगळ्यांमध्ये पुरोहितवर्ग अत्यंत महत्त्वाचा असतो. एकातºहेने हे सगळे सोहळे, अनुष्ठाने रद्द झाल्याने यातून मिळणाऱ्या दक्षिणा व भिक्षुकीपासून पुरोहितवर्ग वंचित झाला आहे. त्याचा फटका संपूर्ण वर्षभर बसणार असल्याने हा वर्ग चिंतित आहे. पूजाविधी नाही म्हणून दक्षिणा व भिक्षुकी नाही आणि म्हणून संकटाची स्थिती यांच्यावर ओढवल्या गेली आहे.मुहूर्त गेला तो परत येणार नाही - स्वप्निल लांबडे: पूजन, विवाह, मौंज, वास्तू असे सोहळे मुहूर्तावर केले जातात आणि म्हणूनच पुरोहितांची गरज भासते. हे मुहूर्त निघून गेल्यावर ते मुहूर्त पुन्हा येणार नाही. त्यामुळे आता न झालेले कार्य पुढे करावे, असेही होणार नाही, शिवाय या सगळ्यांवर पुरोहितवर्ग जगत असतो. काही तर अत्यंत गरीब आहेत. बऱ्याचदा एका मुहूर्ताला १० कामे एकसाथ येत असतात आणि पुढचे १० दिवस काहीच काम नसते. आता तर संपूर्ण महिना उलटून गेला. अशास्थितीत केवळ याच कामावर जगणारा आमचा पुरोहित उपासमारीशी झुंजत असल्याचे स्वप्निल लांबडे गुरुजी यांनी ‘लोकमत’कडे सांगितले. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस