शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नागपुरातील वृक्षगणनेत विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:57 IST

नागपूर शहरात मागील नऊ वर्षात वृक्षगणना झालेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षगणना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोविड-१९ मुळे याहीवर्षी वृक्षगणनेत विघ्न आले आहे.

ठळक मुद्देनऊ वर्षानंतर होणार होती गणना वृक्षवाढीचा दर कसा कळणार

गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनयम १९७५ च्या तरतुदीनुसार दर पाच वर्षांनी वृक्षगणना होणे अपेक्षित आहे. परंतु नागपूर शहरात मागील नऊ वर्षात वृक्षगणना झालेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षगणना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आधुनिक पद्धतीने वृक्षगणना केली जाणार होती. मात्र कोविड-१९ मुळे याहीवर्षी वृक्षगणनेत विघ्न आले आहे. यासाठी पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.देशभरातील हिरव्यागार शहरात नागपूरचा समावेश होतो. परंतु शहरातील वृक्षसंवर्धन व वृक्षगणना यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही. उद्यान विभागात मनुष्यबळ नाही. अशा अडचणीमुळे वृक्षगणना करता आलेली नाही.२०११ मध्ये झालेल्या गणनेनुसार नागपूर शहरात २१ कोटी ४३ लाख ८३६ झाडे होती. म्हणजे प्रत्येक १० व्यक्तींसाठी नऊ झाडे होती. शहरातील झाडांची संख्या विचारात घेता वृक्षगणनेसाठी सधारणत: चार महिन्यांचा कालावधी लागतो. गेल्या मार्च महिन्यात याला सुरुवात केली जाणार होती. मात्र कोविड-१९ मुळे गणना करण्याचे काम पुढे ढकलण्यात आले. आता ती पुढील वर्षात हाईल, अशी माहिती उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.शहरातील विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. तसेच शेकडो झाडे वाळली. यामुळे सध्या नागपूर शहरात किती झाडे आहेत, हे वृक्षगणनेनंतरच स्पष्ट होणार आहे. बांधकाम वा विकास कामांसाठी झाडे तोडावयाची असल्यास एका झाडाच्या बदल्यात संबंधित व्यक्तीने पाच झाडे लावणे आवश्यक आहे. याची हमी मिळाल्यानंतरच झाडे तोडण्याला परवानगी दिली जाते. त्यानुसार मागील ९ वर्षात १६ हजार झाडे लावणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात हजाराच्या आसपास झाडे लावण्यात आली.

४०.३३ कोटी मिळण्याची शक्यता कमीचनागपूर शहरात मनपाची १३१ तर नासुप्रची ४६ उद्याने आहेत. नाल्याच्या काठावरील उद्यानांसाठी नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून वापरण्याचे प्रस्तावित आहे. नासुप्रची मनपाकडे हस्तांतरित होणाऱ्या उद्यानांची देखभाल करावी लागणार आहे. आयुक्तांच्या अर्थसंकल्पात २०२०-२१ या वर्षात उद्यान विभागासाठी ४०.३३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. परंतु आर्थिक स्थितीचा विचार करता हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.वृक्षगणना पुढील वर्षातमनपाने वृक्षगणनेसाठी नियोजन केले होते. ही प्रक्रिया सुरू करणार होतो. परंतु कोविड-१९ मुळे मार्च महिन्यापासून कामावर परिणाम झाला आहे. परिस्थितीचा विचार करता पुढील काही महिने गणना शक्य नाही. आता ती पुढील वर्षात करावी लागेल.- अमोल चोरपगार, उद्यान अधीक्षक

टॅग्स :Governmentसरकार