शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नागपुरातील वृक्षगणनेत विघ्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:57 IST

नागपूर शहरात मागील नऊ वर्षात वृक्षगणना झालेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षगणना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोविड-१९ मुळे याहीवर्षी वृक्षगणनेत विघ्न आले आहे.

ठळक मुद्देनऊ वर्षानंतर होणार होती गणना वृक्षवाढीचा दर कसा कळणार

गणेश हूड ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनयम १९७५ च्या तरतुदीनुसार दर पाच वर्षांनी वृक्षगणना होणे अपेक्षित आहे. परंतु नागपूर शहरात मागील नऊ वर्षात वृक्षगणना झालेली नाही. कायद्यातील तरतुदीनुसार वृक्षगणना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आधुनिक पद्धतीने वृक्षगणना केली जाणार होती. मात्र कोविड-१९ मुळे याहीवर्षी वृक्षगणनेत विघ्न आले आहे. यासाठी पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.देशभरातील हिरव्यागार शहरात नागपूरचा समावेश होतो. परंतु शहरातील वृक्षसंवर्धन व वृक्षगणना यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही. उद्यान विभागात मनुष्यबळ नाही. अशा अडचणीमुळे वृक्षगणना करता आलेली नाही.२०११ मध्ये झालेल्या गणनेनुसार नागपूर शहरात २१ कोटी ४३ लाख ८३६ झाडे होती. म्हणजे प्रत्येक १० व्यक्तींसाठी नऊ झाडे होती. शहरातील झाडांची संख्या विचारात घेता वृक्षगणनेसाठी सधारणत: चार महिन्यांचा कालावधी लागतो. गेल्या मार्च महिन्यात याला सुरुवात केली जाणार होती. मात्र कोविड-१९ मुळे गणना करण्याचे काम पुढे ढकलण्यात आले. आता ती पुढील वर्षात हाईल, अशी माहिती उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.शहरातील विकास कामांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. तसेच शेकडो झाडे वाळली. यामुळे सध्या नागपूर शहरात किती झाडे आहेत, हे वृक्षगणनेनंतरच स्पष्ट होणार आहे. बांधकाम वा विकास कामांसाठी झाडे तोडावयाची असल्यास एका झाडाच्या बदल्यात संबंधित व्यक्तीने पाच झाडे लावणे आवश्यक आहे. याची हमी मिळाल्यानंतरच झाडे तोडण्याला परवानगी दिली जाते. त्यानुसार मागील ९ वर्षात १६ हजार झाडे लावणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात हजाराच्या आसपास झाडे लावण्यात आली.

४०.३३ कोटी मिळण्याची शक्यता कमीचनागपूर शहरात मनपाची १३१ तर नासुप्रची ४६ उद्याने आहेत. नाल्याच्या काठावरील उद्यानांसाठी नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून वापरण्याचे प्रस्तावित आहे. नासुप्रची मनपाकडे हस्तांतरित होणाऱ्या उद्यानांची देखभाल करावी लागणार आहे. आयुक्तांच्या अर्थसंकल्पात २०२०-२१ या वर्षात उद्यान विभागासाठी ४०.३३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. परंतु आर्थिक स्थितीचा विचार करता हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.वृक्षगणना पुढील वर्षातमनपाने वृक्षगणनेसाठी नियोजन केले होते. ही प्रक्रिया सुरू करणार होतो. परंतु कोविड-१९ मुळे मार्च महिन्यापासून कामावर परिणाम झाला आहे. परिस्थितीचा विचार करता पुढील काही महिने गणना शक्य नाही. आता ती पुढील वर्षात करावी लागेल.- अमोल चोरपगार, उद्यान अधीक्षक

टॅग्स :Governmentसरकार