शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नागपुरातील प्रार्थनास्थळे : आहे 'कोरोना' तरी भक्तांची 'आस्था' भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:57 IST

‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारने सार्वजनिक सोहळे, गर्दी यांना मज्जाव केला असला तरी भक्तांची आस्था त्यावर भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देलोकांचा विश्वास ‘देव तारी त्याला कोण मारी’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सृष्टीची किमयाच सारी.. मारे तो शैतान, तारे सो भगवान. आधी निसर्गाची अधोगती करायची आणि नंतर निसर्ग कोपला की गोंधळ माजवायचा. ‘कोरोना’ हा त्याच कोपातला एक भाग आणि या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र ‘त्राहीमाम त्राहीमाम’ माजला आहे. माणूस कितीही विज्ञानवादी असला आणि मानवाला त्याच्या कुशल बुद्धीवर प्रचंड विश्वास असला तरी त्यालाही मर्यादा आहेत. जेव्हा त्या मर्यादेचे भान होते आणि तेव्हा माणूस निसर्गशक्तीला शरण जातो. ही तीच निसर्गशक्ती आहे जिला कोणी भगवंत मानतो, कुणी खुदा तर कुणी जिजस. प्रत्येकाच्या दैवी संकल्पना वेगळ्या असल्या तरी सामान्य भावना तीच आहे, ‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारने सार्वजनिक सोहळे, गर्दी यांना मज्जाव केला असला तरी भक्तांची आस्था त्यावर भारी पडत असल्याचे दिसून येत आहे.भारत हा विविध मतावलंबीयांचा देश आहे आणि देशभरात वेगवेगळ्या शहरांत सर्वच जण आपापले जीवन जगत असतात. नागपुरातही हीच स्थिती आहे आणि त्यामुळेच येथे मंदिरे, गुरुद्वार, विहारे, मशीत, चर्च आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळायला लागले, तेव्हापासूनच राज्य शासनाने सजगतेची भूमिका घेतली आणि सिनेमा थिएटर्स, नाट्यगृहे, मॉल्स, बगीचे, शाळा, कॉलेजेस यांना बंद करण्याचा निर्णय घेतला तर सार्वजनिक सोहळे जसे विवाह, सभा, आंदोलने घेण्यावर सक्तीची बंदी केली आहे. अशात भिन्न भिन्न मतावलंबीयांची आराधना स्थळे मात्र बिनधोक सुरू आहेत. येथे येणारी भाविक मंडळीही आपल्या दैनिक दर्शन, पूजनासाठी येत आहेत. सीताबर्डी येथील श्रीगणेश टेकडी मंदिर, इलेक्ट्रिक मार्केट रोडवरील शनिमंदिर, वाठोडा येथील स्वामीनारायण मंदिर, मोठा ताजबाग, लहान ताजबाग, वर्धा महामार्गावरील साई मंदिर, नंदनवन येथील राधाकृष्ण मंदिर अशी सर्वच आराधना स्थळांवर भाविकांची नियमित गर्दी दिसून येत आहे.अशा प्रार्थनास्थळांवर येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनांकडून विशेष अशा कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. संरक्षण मास्क व सॅनिटायझरचा आधीच तुटवडा निर्माण झाल्याचे नवीनच संकट उद्भवले असताना, प्रार्थनास्थळांवर येणारा भाविक कुठल्याही चिंतेशिवाय असल्याचे दिसून येत आहे. संरक्षण व्यवस्था पुरविली जात नसली तरी खबरदारीचे आवाहन केले जात आहेत.प्रत्येक वेळेला खरबदारीच्या घोषणा - दीपक बोरगावकरप्रत्येकच जण आपापल्या परीने खबरदारी घेत आहे. संकट आल्यावर कुणालाही भगवंतच आठवतो आणि अशा वेळी भाविकांना दर्शनासाठी येण्यास मज्जाव केला जाऊ शकत नाही. शिवाय, बाजारातच संरक्षण प्रणालीचा तुटवडा भासत असल्याने देवळात दर्शन घेण्यास येणाऱ्यांना हात व पाय स्वच्छ धुण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय आरतीच्या पूर्वी व नंतर काळजी घेण्याचे संदेश प्रसारित केले जात असल्याची माहिती वर्धा महामार्गावरील साईमंदिरचे व्यवस्थापक दीपक बोरगावकर यांनी दिली.पंडित, मौलवी करत आहेत सृष्टीच्या सुरक्षेची याचनाबऱ्याच ठिकाणचे पुजारी व मौलवी भाविकांना कोरोना महामारीच्या काळात दक्षता बाळगण्याचे आवाहन करत असतानाच, सृष्टी रक्षणार्थ पंडित महामृत्युंजय मंत्राचा जप करत आहेत तर मौलवी कुरणातील आयते वाचत असल्याचे दिसून येत आहे. काही पुरोहितांनी सृष्टी संरक्षणार्थ महामृत्युंजय यज्ञ करण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाReligious Placesधार्मिक स्थळे