शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वेदना कोरोनाच्या : नागपुरात कोरोनाने हिरावले ४७६ बालकांचे आई-बाबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 20:19 IST

Corona effect

ठळक मुद्देसहा कुटुंबांत तर आई-वडील दोघेही गेले देवाघरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक कुटुंबे उद‌्ध्वस्त केली आहेत. या लाटेत तरुणांचेही जीव गेले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत २२५०च्या वर मृत्यू झाले आहेत. कोरोनाने जिल्ह्यातील ४७० बालकांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या बालकांचे कोरोनामुळे आई अथवा वडील गेले आहेत; तर ६ बालकांचे आई-वडील दोघेही देवाघरी गेले आहेत.

घरातील कर्ता पुरुष, स्त्री यांचा मृत्यू कोरोनाने झाला. जीव गमावलेल्यांपैकी अनेकांची मुले १८ वर्षांखालील आहेत. आई-वडिलांपैकी कुणी एक असेल तर त्यांना थोडाफार आधार तरी आहे; पण ज्या बालकांनी आई-वडील दोघेही गमावले, त्यांचे संगोपन व संरक्षणाचा प्रश्न आहे. बालकांच्या या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो याचिका दाखल करून घेतली. न्यायालयाने सरकारला काही निर्देश दिले. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्याचे निर्देश दिले. यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व ग्रामीणचे अधीक्षक, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचा समावेश केला. जिल्हाधिकारी या कृती दलाचे अध्यक्ष असून, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक आहेत. प्रत्येक सदस्याला त्याचे कर्तव्य व जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

 कृती दल काय करणार

१) ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनाने हिरावले, अशा बालकांना बालगृहात ठेवले जाणार.

२) मुलांच्या संगोपनासह शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाकडून उचलली जाणार.

३) बालगृहात ठेवलेल्या मुलांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाणार.

४) मुलांची जबाबदारी बाल संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविली जाणार.

५) या बालकांचे आर्थिक व मालमत्ताविषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेतली जाणार.

 जिल्ह्यात निराधार झालेले बालके

आईला गमावलेले - ८७

वडिलांना गमावलेले - ३८३

दोघांनाही गमावलेले - ६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर