शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा कोरोनाचे संकट! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:58 IST

Corona Nagpur News दिवाळीनंतर उसळलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट झाडीपट्टी रंगभूमीच्या आनंदावर पुन्हा विरजण घालत आहे. एक तर नाटकांचे बुकिंग होत नाही आणि जी मंडळे नाटके आयोजित करत आहेत, तिथे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देआरोग्य केंद्रांचा मंडळांना इशारा रंगकर्मींची दुविधागर्दी टाळा अन्यथा होणार कारवाई

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कठोर मार्गदर्शिकेसह सांस्कृतिक कार्यक्रमांना मुभा देण्यात आल्यानंतर झाडीपट्टी रंगभूमीवर पुन्हा वर्दळ सुरू झाली आहे. मात्र, दिवाळीनंतर उसळलेली कोरोना संसर्गाची दुसरी लाट त्या आनंदावर पुन्हा विरजण घालत आहे. एक तर नाटकांचे बुकिंग होत नाही आणि जी मंडळे नाटके आयोजित करत आहेत, तिथे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचाच परिणाम झाडीपट्टीतील आरोग्य केंद्रांनी संबंधित मंडळांना खबरदारीचा इशारा देणारे पत्र जारी केले आहे.

कोरोना आणि टाळेबंदीमुळे यंदा झाडीपट्टी रंगभूमीचा सिझन सुरू होणार नाही, अशी भीती असतानाच ५ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने सांस्कृतिक कार्यक्रमांना ढिल दिली. त्याअनुषंगाने नाट्यसंस्थांनी भाऊबीजेच्या मुहूर्ताची तयारी सुरू केली. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक अतिशय सजग असल्याने तेथील मंडळांनी नाटकांचे बुकिंग घेण्यास सध्या तरी नकार दर्शवला आहे. त्यामुळे, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या निर्मात्यांना बुकिंग नसल्याचा फटका बसत आहे. त्यांची गुंतवणूक पाण्यात जाईल, अशी त्यांना भीती वाटत आहे. मात्र, जिथे कुठे बुकिंग मिळत आहे. तेथे कोरोना संदर्भातले सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. नाटकाला २०० प्रेक्षकांच्या वर परवानगी नसताना दोन हजारावर प्रेक्षक हजेरी लावत आहेत आणि ९५ टक्के लोक मास्क घालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम संबंधित तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कठोर भूमिका घेण्यास सज्ज झाले आहेत. अशाच एका प्रकरणात १७ नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यातील खोडशिवनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित सर्व ग्रामपंचायतींना निर्वाणीचा इशारा देणारे पत्र जारी केले आहे. जमावबंदी टाळण्याचे आवाहन करताना इतरांचा जीव धोक्यात घालण्याच्या कारणाने आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आयोजकांना तोटा सहन करायचा नाही

नाट्य सादरीकरणाच्या वेळी प्रेक्षकांसाठी सहा फूट अंतरावर एक खुर्ची असा नियम आहे. एका अर्थाने २५-३० टक्केच प्रेक्षकांना नाटक बघण्याची मुभा आहे. या नियमामुळे तिकीट खिडकीवरील उत्पन्न घसरणार असल्याने आयोजक मंडळे तोटा सहन करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे, बरीच मंडळे नाटकाचे प्रयोग घेण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र, काही ठिकाणी कोरोना संबंधातील सर्वच नियमांना तिलांजली दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

धोका असाही अन् तसाही!

झाडीपट्टी रंगभूमी ही कलावंतांसोबतच अनेकांची प्रमुख उपजीविका आहे. त्यामुळे, नाटक झाले नाही तर तसेही मरण आहेच आणि नाटक झाले तर कोरोना संसर्गाचा धोका आहे, अशी भावना कलावंत व्यक्त करत आहेत. या विषयावर सध्या कुणीच बोलण्यास तयार नाहीत, हे विशेष. मात्र, बरेच कलावंत हे नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, मुंबई, पुणे या अत्याधिक कोरोना बाधित शहरांतून येत असल्याने आणि सद्यस्थितीचा अंदाज घेता झाडीपट्टी रंगभूमीवर धोका निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस