शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

नागपुरात शहरभर कोरोना वाहक : काहींनी बंदचा आदेश झुगारला, कडक कारवाई करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 21:41 IST

जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. गुरुवारी काहींनी हा आदेश झुगारून हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, पान व खऱ्र्याची दुकाने सुरू ठेवली.

ठळक मुद्देठिकठिकाणी हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, पानटपऱ्या सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व बीअर शॉपी, वाईन शॉप, बार, रेस्टॉरेन्ट, क्लब, देशी दारूची दुकाने, शॉपिंग मॉल, पानठेले यासह अन्य दुकाने (अत्यावश्यक वस्तू वगळता) ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. परंतु, गुरुवारी काहींनी हा आदेश झुगारून हॉटेल्स, नास्ता, चहा, लिंबूपाणी, उसाचा रस, पान व खऱ्र्याची दुकाने सुरू ठेवली. ही बेजबाबदार कृती संपूर्ण समाजाला संकटात ओढणारी आहे. त्यामुळे अशा कोरोना वाहकांवर तातडीने कडक कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहरभर गस्त घातली तरच, हे शक्य होणार आहे.

लिंबूपाणी, उसाचा रस घातकलिंबूपाणी व उसाच्या रसामध्ये बर्फ मिसळवला जातो. कोरोना विषाणू थंड परिस्थितीत अधिक काळ जिवंत राहतो व फोफावतो. त्यामुळे लिंबूपाणी व उसाचा रस पिणे नागरिकांसाठी अधिक घातक आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी लिंबूपाणी व उसाच्या रसाचे ठेले लागले आहेत. नागरिक लिंबूपाणी व उसाचा रस पिण्यासाठी गर्दी करीत आहेत. लिंबूपाणी व उसाचा रस पिऊन झाल्यानंतर काचाचे ग्लास योग्य पद्धतीने स्वच्छ केले जात नाहीत. बादलीभर पाण्यामध्ये वारंवार ग्लास धुतले जातात. त्यातून कोरोना विषाणूचा वेगात फैलाव होऊ शकतो. प्रशासनाने ही बाब सर्वाधिक गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. लिंबूपाणी व उसाच्या रसाचे ठेले तातडीने बंद केले गेले पाहिजे.
व्हीसीए स्टेडियममधील हॉटेल्स उघडेसिव्हिल लाईन्सस्थित व्हीसीए स्टेडियममधील काही हॉटेल्स अर्धवट उघडे ठेवण्यात आले होते. ग्राहकांना आत घेऊन चहा, कॉफी व खाद्य पदार्थ दिले जात होते. बडे व्यावसायिक असल्यामुळे त्यांचे फावत असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. कोरोना हा संपूर्ण समाजाला संकटात ओढणारा विषाणू आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांची प्रशासनाकडे तक्रार नोंदवणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर, तक्रारीवरून कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला गेला पाहिजे.
वस्त्यांमध्ये सर्वाधिक दुकाने सुरूवस्त्यांमधील सर्वाधिक दुकाने सुरू होती. ही दुकाने मुख्य मार्गांवर नसल्यामुळे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. त्यामुळे कारवाई झाली नाही. नागरिकांनी या दुकानांमध्ये बिनधास्तपणे नाश्ता केला. त्यानंतर चहा पिला व खर्रा खरेदी करून घर गाठले. बजरंगनगर, हनुमाननगर, बेसा, हुडकेश्वर, बिडीपेठ, वाठोडा, दर्शन कॉलनी, खरबी, चक्रपाणीनगर, पिपळा, विश्वकर्मानगर, अयोध्यानगर यासह अनेक वस्त्यांमध्ये हे चित्र दिसून आले.मुख्य रस्त्यांवर काटेकोर पालनमुख्य रस्त्यांवरील दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन केले. गणेशपेठ बसस्थानक, कॉटन मार्केट, रेल्वेस्थानक, धरमपेठ, महाल, इतवारी, मंगळवारी, सदर, सिव्हिल लाईन्स, रामदासपेठ, शिवाजीनगर, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, प्रतापनगर, खामला यासह अन्य वर्दळीच्या ठिकाणी चहा, लिंबूपाणी व उसाच्या रसाची एक-दोन दुकाने वगळता अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे या परिसरात गर्दीही कमी दिसून आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर