शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

राजभवनाच्या सुरक्षेला सुरुंग

By admin | Updated: February 17, 2016 02:58 IST

बेलगाम झालेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांचे मिशन ‘मोक्का’ सुरु आहे. इकडे मात्र उपराजधानीचे वैभव असलेल्या

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरबेलगाम झालेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्यासाठी पोलिसांचे मिशन ‘मोक्का’ सुरु आहे. इकडे मात्र उपराजधानीचे वैभव असलेल्या राजभवनाच्या सुरक्षेला सुरुंग लागला आहे. देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपालांचे शासकीय निवासस्थान असलेले राजभवन गुन्हेगारांच्या रडारवर आहे. येथील तटबंदी भेदून हैदोस घालण्याच्या घटनात गत दीड वर्षांत वाढ झाली आहे.असे असताना राजभवन प्रशासनाकडून तक्रार केल्यानंतरही चोरीच्या एका प्रकरणात मात्र प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात नागपूर पोलिसांना चार महिन्यांचा कालावधी लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे उपराजधानीतील संवेदनशील स्थळ खरच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उपस्थित झाला आहे. नागपुरातील राजभवनाची रचना पाहता येथे प्रवेश करणे कठीण आहे. सुरक्षेची तटबंदी मजबूत करण्यासाठी येथे १२ वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. असे असतानाही गुन्हेगारांनी मात्र येथील सुरक्षा व्यवस्था भेदत गत दोन महिन्यात चार वेळा प्रवेश केला आहे. राजभवनाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी नागपूर शहर पोलिसांकडे आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी राजभवनाच्या प्रवेशद्वारावर २४ पोलीस कर्मचारी विविध पाळ्यात तैनात असतात. मात्र त्याचांकडे सुरक्षाविषयक तपासणींसाठी साधने अपुरी आहेत. राजभवनाची सुरक्षा व्यवस्था चौकस करण्यासाठी गत दहा वर्षांत दोनवेळा सुरक्षा आॅडिट झाले. मात्र या आॅडिटच्या शिफारशी किती अमलात आल्या, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.