शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ला थंड प्रतिसाद : शासनाचा कायदा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 10:38 IST

नागपूर शहर व जिल्ह्यात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ कायद्याची शहरात अंमलबजावणी न झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत जिरलेच नाही, ही वस्तुस्थितीही आहे.

ठळक मुद्देपावसाचे पाणी जमिनीत जिरलेच नाही!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर व जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली. परंतु सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊ स न झाल्याने नागपूर शहराला पाणीपुरवठा करण्यात पेंच प्रकल्पात जेमतेम २७ टक्के जलसाठा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शहरात पाणीटंचाई भासणार आहे. अशा परिस्थितीत विहिरीतील पाण्याचा वापर करावा लागणार आहे. परंतु ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ कायद्याची शहरात अंमलबजावणी न झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत जिरलेच नाही, ही वस्तुस्थितीही आहे.शासनाने तीनशे चौरस मीटर भूखंडावरील बांधकामासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केले आहे. परंतु केवळ ५६ इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. ३० लाख लोखसंख्येच्या नागपूर शहरात दरवर्षी शेकडो इमारती उभ्या राहतात मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंगची मोजक्याच ठिकाणी सोय असते. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा एक प्रयोग म्हणून महापालिकेने प्रत्येक इमारतीत ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केले खरे, पण याची अंमलबजावणी झालीच नाही. ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ योजनेंतर्गत शहरातील प्रत्येक इमारत आणि निवासी गाळ्यांमध्ये पावसाचे पाणी अडवण्यासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी शासनाने अधिसूचना काढली होती. यात शासनाने तीनशे चौरस मीटर भूखंडावरील बांधकामासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवून ठेवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीच होत नसल्याचे चित्र आहे. शहरात दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. जुन्या आणि नवीन शहरातील विहिरी उन्हाळ्यात आटतात. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. याच भागात पावसाचे पाणी अडवून ते जिरवण्याची सोय नाही. नागरिकांकडूनही रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रतिसाद मिळत नाही.

अधिकारी म्हणतात ‘बंधनकारक’तीनशे चौरस मीटर भूखंडावरील बांधकामासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक’ आहे. विभागातर्फे मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम झाले की नाही याची नियमित पाहणी केली जाते. बांधकाम करताना सर्व नियमांचे पालन झाल्यानंतरच भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते, अशी माहती महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Rainपाऊस