शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कूचबिहार हिंसेवरून राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कूचबिहारमधील गोळीबार हा नरसंहारच असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यात नेत्यांच्या प्रवेशावर बंदी टाकली आहे. प्रवेश नाकारून आयोग तथ्य दाबत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी लावला. तर ममता यांच्या इशाऱ््यावरूनच स्थानिकांनी सुरक्षादलांवर हल्ला केला असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

शनिवारी स्थानिक लोकांनी हल्ला केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने गोळीबार केला व त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. स्थानिक लोक जवानांच्या बंदुका हिसकवण्याचा प्रयत्न करत होते, असे म्हटले जात आहे. यावर ममता यांनी भाष्य केले. सीतलकूची येथे केंद्रीय सुरक्षारक्षकांनी मतदानादरम्यान लोकांवर जाणूनबुजून गोळीबार केला. मी १४ एप्रिल रोजी तेथे जाऊ इच्छिते. देशात अयोग्य केंद्र सरकार व अयोग्य गृहमंत्री आहेत. सीआयएसएफला स्थितीचा सामना करता येत नाही. केंद्रीय दलांमधील एक वर्ग लोकांवर अत्याचार करत आहे. पहिल्या टप्प्यापासून मी हा दावा करत आहे. मात्र कुणीही माझ्याकडे लक्ष दिलेले नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूलचे कार्यकर्ते या घटनेविरोधात राज्यभरात आंदोलन करतील. निवडणूक आयोगाने एमसीसी म्हणजेच आदर्श आचार संहितेचे नाव बदलून मोदी आचारसंहिता करावे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

ममता मृत्यूचे राजकारण करत आहेत - शहा

शांतीपूर येथे एका रोड शो दरम्यान अमित शहा यांनी ममतांवर टीकास्त्र सोडले. ममतांच्या सल्ल्यावरून सीतलकूची येथे सुरक्षा दलांवर स्थानिकांनी हल्ला केला. मृत्यूचे ममता आता राजकारण करत आहेत. ममता याच त्या मृत्यूंसाठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.