शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कूचबिहार हिंसेवरून राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सिलिगुडी : चौथ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारावरून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कूचबिहारमधील गोळीबार हा नरसंहारच असून, निवडणूक आयोगाने जिल्ह्यात नेत्यांच्या प्रवेशावर बंदी टाकली आहे. प्रवेश नाकारून आयोग तथ्य दाबत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी लावला. तर ममता यांच्या इशाऱ््यावरूनच स्थानिकांनी सुरक्षादलांवर हल्ला केला असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

शनिवारी स्थानिक लोकांनी हल्ला केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने गोळीबार केला व त्यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. स्थानिक लोक जवानांच्या बंदुका हिसकवण्याचा प्रयत्न करत होते, असे म्हटले जात आहे. यावर ममता यांनी भाष्य केले. सीतलकूची येथे केंद्रीय सुरक्षारक्षकांनी मतदानादरम्यान लोकांवर जाणूनबुजून गोळीबार केला. मी १४ एप्रिल रोजी तेथे जाऊ इच्छिते. देशात अयोग्य केंद्र सरकार व अयोग्य गृहमंत्री आहेत. सीआयएसएफला स्थितीचा सामना करता येत नाही. केंद्रीय दलांमधील एक वर्ग लोकांवर अत्याचार करत आहे. पहिल्या टप्प्यापासून मी हा दावा करत आहे. मात्र कुणीही माझ्याकडे लक्ष दिलेले नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तृणमूलचे कार्यकर्ते या घटनेविरोधात राज्यभरात आंदोलन करतील. निवडणूक आयोगाने एमसीसी म्हणजेच आदर्श आचार संहितेचे नाव बदलून मोदी आचारसंहिता करावे, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

ममता मृत्यूचे राजकारण करत आहेत - शहा

शांतीपूर येथे एका रोड शो दरम्यान अमित शहा यांनी ममतांवर टीकास्त्र सोडले. ममतांच्या सल्ल्यावरून सीतलकूची येथे सुरक्षा दलांवर स्थानिकांनी हल्ला केला. मृत्यूचे ममता आता राजकारण करत आहेत. ममता याच त्या मृत्यूंसाठी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला.