शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

धर्मांतरण म्हणजे देशावरील हल्लाच : तरुण विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:05 IST

एका नियोजित षङ्यंत्रातून भारतावर सातत्याने आघात करण्यात येत आहेत. देशाच्या मूळ चेतनेला ध्वस्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताच्या अहिंदूकरणाचे षङ्यंत्र रचण्यात आले आहे. धर्मांतरणाचे प्रमाण पाहता हा देशावरील एक हल्लाच आहे, असे मत माजी खासदार तरुण विजय यांनी व्यक्त केले. प्रो.राजेंद्र सिंह स्मृती संस्थेतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक रज्जू भय्या यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सामाजिक परिवर्तन आणि भविष्याचा भारत’ या विषयावरील व्याख्यानादरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देरज्जूभय्या यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका नियोजित षङ्यंत्रातून भारतावर सातत्याने आघात करण्यात येत आहेत. देशाच्या मूळ चेतनेला ध्वस्त करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. भारताच्या अहिंदूकरणाचे षङ्यंत्र रचण्यात आले आहे. धर्मांतरणाचे प्रमाण पाहता हा देशावरील एक हल्लाच आहे, असे मत माजी खासदार तरुण विजय यांनी व्यक्त केले. प्रो.राजेंद्र सिंह स्मृती संस्थेतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक रज्जू भय्या यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सामाजिक परिवर्तन आणि भविष्याचा भारत’ या विषयावरील व्याख्यानादरम्यान ते बोलत होते.‘आयटी पार्क’ येथील ‘पर्सिस्टंट’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक,जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य, ‘आनंद ही आनंद’चे संस्थापक विवेक जी. ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशाचा इतिहास गौरवशाली होता. मात्र भविष्याबाबत आताच चिंतन करणे आवश्यक आहे. देशाच्या सीमेवरील जनजातींचे संवर्धन झाले पाहिजे. शिवाय दैनंदिन जीवनातून अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. भारतीयत्वाच्या विरोधात काम करणाऱ्यांना योग्य ते उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन तरुण विजय यांनी केले. यावेळी राजेंद्र सिंह स्मृती संस्थेच्या अध्यक्षा आभा सिंह, वरिष्ठ उपाध्यक्षा छाया गाडे, सचिव अजय सिंह, कोषाध्यक्ष आलोक सिंह, उपाध्यक्ष धर्मवीर सिंह उपस्थित होते. अजय कुमार सिंह यांनी संचालन केले तर सोनल सिंहने आभार मानले.तीन सरसंघचालकांच्या निवडीसाठी घेतला माझा सल्लायावेळी मा.गो.वैद्य यांनी सरसंघचालकांच्या निवड प्रक्रियेबाबतच्या आठवणी सांगितल्या. संघाच्या घटनेनुसार सरसंघचालकांसाठी निवडणूक घेतली जात नाही़ विशेष लोकांचा सल्ला घेऊन सरसंघचालकच आपल्या हयातीत पुढच्या सरसंघचालकांची निवड करत असतात़ आतापर्यंत तीन सरसंघचालकांच्या निवडीसाठी माझादेखील सल्ला घेण्यात आला. विशेष म्हणजे मी सुचविलेल्या तीनही पदाधिकाºयांची सरसंघचालकपदी निवड झाली, असे वैद्य यांनी सांगितले.---तर रज्जू भय्या वैज्ञानिक झाले असते : गडकरीरज्जू भय्या हे कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. अणुऊर्जा वैज्ञानिक म्हणून काम करीत असताना होमी जहांगीर भाभा यांनी त्यांना देशाच्या परमाणू मोहिमेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. मात्र रज्जू भय्या यांनी संघकार्याला प्राधान्य दिले. देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकला असे भाभा म्हणायचे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. रज्जू भय्या यांचे जीवन प्रेरणादायी होते. ते देश आणि समाजाला समर्पित व्यक्तिमत्त्व होते आणि अखेरपर्यंत राष्ट्र पुनर्निर्माणाचाच विचार त्यांच्या मनात होते, असे गडकरी यावेळी म्हणाले़

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर