शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भरारी पथक ठेवणार खते व बियाण्यांवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:29 IST

खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २५ मे नंतर बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.

ठळक मुद्दे२५ मे नंतर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध : कृषी विभागाचे खरीपाचे नियोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २५ मे नंतर बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून खते व बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे. खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून महाबीज व इतर कंपन्यांकडून बियाण्यांची मागणी नोंदवण्यात येते. मात्र, काही वेळेस शेतकऱ्यांची फसवणूकही होते. काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीचे प्रकारही समोर येतात. शेतकऱ्यांची फसवणूक टळावी यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात प्रत्येकी एक असे १३ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख आहेत. तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख हे प्रमुख आहेत. पथकांमार्फत जिल्ह्यात बियाणे, खते व कीटकनाशके योग्य दरात विक्री व निविष्ठा गुणवत्ता सहनियंत्रणाबाबत धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे सहनियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आहे. नियंत्रण कक्षाची स्थापनाखते, बियाणे व कीटकनाशकाच्या उपलब्धतेसंदर्भात तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष पंचायत समिती स्थापन करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी विभागात सुद्धा जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष राहणार आहे. १६ मे ते १५ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष राहणार असून, शेतकऱ्यांना काही अडचणी, तक्रारी असल्यास त्याची दखल घेण्यात येणार आहे. बीटी कापसाच्या बद्दलची तक्रार जिल्हा अधिक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आहे. तर बीटी सोडून इतर पिकांबद्दलची तक्रार पं.स.चे कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर