शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

भरारी पथक ठेवणार खते व बियाण्यांवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:29 IST

खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २५ मे नंतर बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.

ठळक मुद्दे२५ मे नंतर बियाणे विक्रीसाठी उपलब्ध : कृषी विभागाचे खरीपाचे नियोजन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २५ मे नंतर बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून खते व बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे. खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून महाबीज व इतर कंपन्यांकडून बियाण्यांची मागणी नोंदवण्यात येते. मात्र, काही वेळेस शेतकऱ्यांची फसवणूकही होते. काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीचे प्रकारही समोर येतात. शेतकऱ्यांची फसवणूक टळावी यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात प्रत्येकी एक असे १३ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख आहेत. तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख हे प्रमुख आहेत. पथकांमार्फत जिल्ह्यात बियाणे, खते व कीटकनाशके योग्य दरात विक्री व निविष्ठा गुणवत्ता सहनियंत्रणाबाबत धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे सहनियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आहे. नियंत्रण कक्षाची स्थापनाखते, बियाणे व कीटकनाशकाच्या उपलब्धतेसंदर्भात तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष पंचायत समिती स्थापन करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी विभागात सुद्धा जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष राहणार आहे. १६ मे ते १५ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष राहणार असून, शेतकऱ्यांना काही अडचणी, तक्रारी असल्यास त्याची दखल घेण्यात येणार आहे. बीटी कापसाच्या बद्दलची तक्रार जिल्हा अधिक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आहे. तर बीटी सोडून इतर पिकांबद्दलची तक्रार पं.स.चे कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर