शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

बाबासाहेब व भाऊसाहेबांचे शेतीविषयक विचार परस्परपूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:54 IST

डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच देशाच्या उभारणीतील विचार परस्परपूरक होते. दुर्दैवाने देशाने त्यांचे धोरण स्वीकारले नसल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या आजही कायम राहिल्या, अशी खंत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअमिताभ पावडे : जनमंच व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्सचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच देशाच्या उभारणीतील विचार परस्परपूरक होते. दुर्दैवाने देशाने त्यांचे धोरण स्वीकारले नसल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या आजही कायम राहिल्या, अशी खंत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी व्यक्त केली.जनमंच व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाबासाहेब ते भाऊसाहेब : या दोन महापुरुषांचे शेतीविषयक विचारधन आजच्या काळाशी सुसंगत कसे?’ यावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बँक आॅफ महाराष्ट्रचे माजी महाव्यवस्थापक हरिश्चंद्र सुखदेवे, जनमंचचे अध्यक्ष शरद पाटील, नरेश क्षीरसागर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अमिताभ पावडे म्हणाले, शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या शोषणाचे मूळ धर्मात आहे. धर्माच्या नावाने अनेक बंधने त्यांच्यावर लादली गेली आणि या कष्टकऱ्याने अंधश्रद्धेमुळे ही मानसिक गुलामी स्वीकारली. या दोन्ही महापुरुषांनी विज्ञानवाद व सद्सद्विवेकबुद्धी स्वीकारण्याचे आवाहन केले होते. ते न स्वीकारल्यामुळे शेतकरी आजही वाईट अवस्थेत असल्याचे ते म्हणाले. डॅमची निर्मिती, नदीजोड प्रकल्प हीबाबासाहेबांनी सुचविलेली धोरणे होती. भाऊसाहेबांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतीय शेतकऱ्यांना जगातील शेतकऱ्यांशी जोडण्याचे प्रयत्न केले. भारतीय कृषीसंबंधी केलेल्या जागतिक कराराचा त्यांनी विरोध केला. त्यांनी कॉम्प्रिहेन्सीव्ह क्रॉप इन्शुरन्सची अट घातली होती व त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाच्या भानगडीत पडण्यापेक्षा नैसर्गिक रूपाने जमिनीतून आवश्यक तेवढेच उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारकडून शेतकऱ्यांच्या नावाने सबसिडी दिली जाते. मात्र याचा खरा फायदा कंपन्या व उद्योगपती लाटत आहेत. सरकारनेच तशी व्यवस्था केल्याची टीका त्यांनी केली.यावेळी हरिश्चंद्र सुखदेवे यांनी कृषी उत्पादनांची मूल्य व्यवस्थापन पद्धत चुकीची असल्याचे मत व्यक्त केले. बाबासाहेबांच्या धोरणातील जमिनीचे राष्ट्रीयकरण व भाऊसाहेबांनी माडलेले को-आॅपरेटिव्ह धोरण अधोरेखित केले. दोन्ही महापुरुषांनी त्यांच्या समाजामध्ये बौद्धिक भांडवल निर्माण केल्याचे सांगत, हे भांडवल नियोजन करून वापरण्याचे आवाहन सुखदेवे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत दोड यांनी केले तर प्रास्ताविक जनमंचचे सचिव प्रणय पराते यांनी केले. अ‍ॅग्रोव्हेटचे अध्यख दिलीप मोहितकर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर