शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब व भाऊसाहेबांचे शेतीविषयक विचार परस्परपूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:54 IST

डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच देशाच्या उभारणीतील विचार परस्परपूरक होते. दुर्दैवाने देशाने त्यांचे धोरण स्वीकारले नसल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या आजही कायम राहिल्या, अशी खंत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअमिताभ पावडे : जनमंच व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्सचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच देशाच्या उभारणीतील विचार परस्परपूरक होते. दुर्दैवाने देशाने त्यांचे धोरण स्वीकारले नसल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या आजही कायम राहिल्या, अशी खंत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी व्यक्त केली.जनमंच व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाबासाहेब ते भाऊसाहेब : या दोन महापुरुषांचे शेतीविषयक विचारधन आजच्या काळाशी सुसंगत कसे?’ यावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बँक आॅफ महाराष्ट्रचे माजी महाव्यवस्थापक हरिश्चंद्र सुखदेवे, जनमंचचे अध्यक्ष शरद पाटील, नरेश क्षीरसागर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अमिताभ पावडे म्हणाले, शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या शोषणाचे मूळ धर्मात आहे. धर्माच्या नावाने अनेक बंधने त्यांच्यावर लादली गेली आणि या कष्टकऱ्याने अंधश्रद्धेमुळे ही मानसिक गुलामी स्वीकारली. या दोन्ही महापुरुषांनी विज्ञानवाद व सद्सद्विवेकबुद्धी स्वीकारण्याचे आवाहन केले होते. ते न स्वीकारल्यामुळे शेतकरी आजही वाईट अवस्थेत असल्याचे ते म्हणाले. डॅमची निर्मिती, नदीजोड प्रकल्प हीबाबासाहेबांनी सुचविलेली धोरणे होती. भाऊसाहेबांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतीय शेतकऱ्यांना जगातील शेतकऱ्यांशी जोडण्याचे प्रयत्न केले. भारतीय कृषीसंबंधी केलेल्या जागतिक कराराचा त्यांनी विरोध केला. त्यांनी कॉम्प्रिहेन्सीव्ह क्रॉप इन्शुरन्सची अट घातली होती व त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाच्या भानगडीत पडण्यापेक्षा नैसर्गिक रूपाने जमिनीतून आवश्यक तेवढेच उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारकडून शेतकऱ्यांच्या नावाने सबसिडी दिली जाते. मात्र याचा खरा फायदा कंपन्या व उद्योगपती लाटत आहेत. सरकारनेच तशी व्यवस्था केल्याची टीका त्यांनी केली.यावेळी हरिश्चंद्र सुखदेवे यांनी कृषी उत्पादनांची मूल्य व्यवस्थापन पद्धत चुकीची असल्याचे मत व्यक्त केले. बाबासाहेबांच्या धोरणातील जमिनीचे राष्ट्रीयकरण व भाऊसाहेबांनी माडलेले को-आॅपरेटिव्ह धोरण अधोरेखित केले. दोन्ही महापुरुषांनी त्यांच्या समाजामध्ये बौद्धिक भांडवल निर्माण केल्याचे सांगत, हे भांडवल नियोजन करून वापरण्याचे आवाहन सुखदेवे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत दोड यांनी केले तर प्रास्ताविक जनमंचचे सचिव प्रणय पराते यांनी केले. अ‍ॅग्रोव्हेटचे अध्यख दिलीप मोहितकर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर