शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

बाबासाहेब व भाऊसाहेबांचे शेतीविषयक विचार परस्परपूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:54 IST

डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच देशाच्या उभारणीतील विचार परस्परपूरक होते. दुर्दैवाने देशाने त्यांचे धोरण स्वीकारले नसल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या आजही कायम राहिल्या, अशी खंत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअमिताभ पावडे : जनमंच व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्सचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच देशाच्या उभारणीतील विचार परस्परपूरक होते. दुर्दैवाने देशाने त्यांचे धोरण स्वीकारले नसल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या आजही कायम राहिल्या, अशी खंत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी व्यक्त केली.जनमंच व अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाबासाहेब ते भाऊसाहेब : या दोन महापुरुषांचे शेतीविषयक विचारधन आजच्या काळाशी सुसंगत कसे?’ यावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बँक आॅफ महाराष्ट्रचे माजी महाव्यवस्थापक हरिश्चंद्र सुखदेवे, जनमंचचे अध्यक्ष शरद पाटील, नरेश क्षीरसागर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अमिताभ पावडे म्हणाले, शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या शोषणाचे मूळ धर्मात आहे. धर्माच्या नावाने अनेक बंधने त्यांच्यावर लादली गेली आणि या कष्टकऱ्याने अंधश्रद्धेमुळे ही मानसिक गुलामी स्वीकारली. या दोन्ही महापुरुषांनी विज्ञानवाद व सद्सद्विवेकबुद्धी स्वीकारण्याचे आवाहन केले होते. ते न स्वीकारल्यामुळे शेतकरी आजही वाईट अवस्थेत असल्याचे ते म्हणाले. डॅमची निर्मिती, नदीजोड प्रकल्प हीबाबासाहेबांनी सुचविलेली धोरणे होती. भाऊसाहेबांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतीय शेतकऱ्यांना जगातील शेतकऱ्यांशी जोडण्याचे प्रयत्न केले. भारतीय कृषीसंबंधी केलेल्या जागतिक कराराचा त्यांनी विरोध केला. त्यांनी कॉम्प्रिहेन्सीव्ह क्रॉप इन्शुरन्सची अट घातली होती व त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाच्या भानगडीत पडण्यापेक्षा नैसर्गिक रूपाने जमिनीतून आवश्यक तेवढेच उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारकडून शेतकऱ्यांच्या नावाने सबसिडी दिली जाते. मात्र याचा खरा फायदा कंपन्या व उद्योगपती लाटत आहेत. सरकारनेच तशी व्यवस्था केल्याची टीका त्यांनी केली.यावेळी हरिश्चंद्र सुखदेवे यांनी कृषी उत्पादनांची मूल्य व्यवस्थापन पद्धत चुकीची असल्याचे मत व्यक्त केले. बाबासाहेबांच्या धोरणातील जमिनीचे राष्ट्रीयकरण व भाऊसाहेबांनी माडलेले को-आॅपरेटिव्ह धोरण अधोरेखित केले. दोन्ही महापुरुषांनी त्यांच्या समाजामध्ये बौद्धिक भांडवल निर्माण केल्याचे सांगत, हे भांडवल नियोजन करून वापरण्याचे आवाहन सुखदेवे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत दोड यांनी केले तर प्रास्ताविक जनमंचचे सचिव प्रणय पराते यांनी केले. अ‍ॅग्रोव्हेटचे अध्यख दिलीप मोहितकर यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर