शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

ग्राहक मंचचा आदेश : शेतकरी अपघात विम्याचे एक लाख अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 8:24 PM

शेतकरी अपघात विमा दाव्याचे एक लाख रुपये ३० दिवसामध्ये तक्रारकर्त्यास अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला आणि या आदेशाची ३० दिवसात अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्यानंतर एक लाख रुपयावर ९ टक्के व्याज द्यावे लागेल असे स्पष्ट केले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपयाची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.

ठळक मुद्देदि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी अपघात विमा दाव्याचे एक लाख रुपये ३० दिवसामध्ये तक्रारकर्त्यास अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला आणि या आदेशाची ३० दिवसात अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्यानंतर एक लाख रुपयावर ९ टक्के व्याज द्यावे लागेल असे स्पष्ट केले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपयाची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व स्मिता चांदेकर यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली. शंकर अवचट असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते रामटेक येथील रहिवासी आहेत. राज्य सरकारने २०१२ मध्ये शेतकऱ्यांचा अपघात विमा काढला होता. त्यांतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख व अपंगत्व आल्यास ५० हजार ते एक लाख रुपये भरपाई देणे निर्धारित होते. विम्याचा कालावधी १५ ऑगस्ट २०१२ ते १४ ऑगस्ट २०१३ पर्यंत होता. दरम्यान, २३ सप्टेंबर २०१२ रोजी अवचट यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या नावावर पारशिवनी येथे शेतजमीन होती. त्यामुळे अवचट यांनी आवश्यक कागदपत्रे गोळा करून ११ सप्टेंबर २०१५ रोजी विमा दावा दाखल केला. परंतु, कंपनीने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. परिणामी, अवचट यांनी ग्राहक मंचमध्ये धाव घेतली होती. कंपनीने मंचमध्ये उत्तर दाखल करून विविध मुद्दे उपस्थित केले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. त्यानंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता अवचट यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.योजनेच्या मूळ उद्देशाला तडातक्रारकर्ता विमा दाव्याचा लाभ व भरपाई मिळण्यास पात्र असल्याचे प्रकरणातील तथ्यांवरून सिद्ध होते. तसेच, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने विमा दावा बंद करून सेवेत त्रुटी ठेवल्याचे स्पष्ट होते. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देणे हा सरकारचा या योजनेमागील मूळ उद्देश होता. परंतु, कंपनीच्या अवैध कृतीमुळे या उद्देशाला तडा गेला असे रोखठोक निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचFarmerशेतकरी