शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचचा आदेश : शेतकरी अपघात विम्याचे एक लाख अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 20:25 IST

शेतकरी अपघात विमा दाव्याचे एक लाख रुपये ३० दिवसामध्ये तक्रारकर्त्यास अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला आणि या आदेशाची ३० दिवसात अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्यानंतर एक लाख रुपयावर ९ टक्के व्याज द्यावे लागेल असे स्पष्ट केले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपयाची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.

ठळक मुद्देदि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी अपघात विमा दाव्याचे एक लाख रुपये ३० दिवसामध्ये तक्रारकर्त्यास अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला दिला आणि या आदेशाची ३० दिवसात अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास त्यानंतर एक लाख रुपयावर ९ टक्के व्याज द्यावे लागेल असे स्पष्ट केले. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ५ हजार अशी एकूण १५ हजार रुपयाची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व स्मिता चांदेकर यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे कंपनीला जोरदार चपराक बसली. शंकर अवचट असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते रामटेक येथील रहिवासी आहेत. राज्य सरकारने २०१२ मध्ये शेतकऱ्यांचा अपघात विमा काढला होता. त्यांतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख व अपंगत्व आल्यास ५० हजार ते एक लाख रुपये भरपाई देणे निर्धारित होते. विम्याचा कालावधी १५ ऑगस्ट २०१२ ते १४ ऑगस्ट २०१३ पर्यंत होता. दरम्यान, २३ सप्टेंबर २०१२ रोजी अवचट यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या नावावर पारशिवनी येथे शेतजमीन होती. त्यामुळे अवचट यांनी आवश्यक कागदपत्रे गोळा करून ११ सप्टेंबर २०१५ रोजी विमा दावा दाखल केला. परंतु, कंपनीने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही. परिणामी, अवचट यांनी ग्राहक मंचमध्ये धाव घेतली होती. कंपनीने मंचमध्ये उत्तर दाखल करून विविध मुद्दे उपस्थित केले व तक्रार खारीज करण्याची मागणी केली. त्यानंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता अवचट यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.योजनेच्या मूळ उद्देशाला तडातक्रारकर्ता विमा दाव्याचा लाभ व भरपाई मिळण्यास पात्र असल्याचे प्रकरणातील तथ्यांवरून सिद्ध होते. तसेच, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने विमा दावा बंद करून सेवेत त्रुटी ठेवल्याचे स्पष्ट होते. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देणे हा सरकारचा या योजनेमागील मूळ उद्देश होता. परंतु, कंपनीच्या अवैध कृतीमुळे या उद्देशाला तडा गेला असे रोखठोक निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचFarmerशेतकरी