शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

ग्राहक मंच : नवी दिल्लीतील जीडीएस हॉटेलला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 20:51 IST

नवी दिल्ली येथील जीडीएस हॉटेलविरुद्ध ११ ग्राहकांनी दाखल केलेली तक्रार नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंशत: मंजूर केली व ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश दिलेत. त्यामुळे जीडीएस हॉटेलला जोरदार दणका बसला.

ठळक मुद्दे११ ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवी दिल्ली येथील जीडीएस हॉटेलविरुद्ध ११ ग्राहकांनी दाखल केलेली तक्रार नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंशत: मंजूर केली व ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश दिलेत. त्यामुळे जीडीएस हॉटेलला जोरदार दणका बसला.ग्राहकांचे ४२ हजार ६०४ रुपये १३ टक्के व्याजाने परत करण्यात यावे असा आदेश मंचने हॉटेलला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही हॉटेलने द्यायची आहे. ४२ हजार ६०४ रुपयांवर २९ नोव्हेंबर २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू होणार आहे. या आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी हॉटेलला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला.ग्राहकांमध्ये नागपूर येथील डॉ. राहुल देशमुख व इतर १० व्यक्तींचा समावेश आहे. त्यांनी २०१६ मधील ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी मध्य प्रदेशातील पेंचमधील किप्लिंग कोर्ट रिसोर्ट येथे जाण्याचे ठरवले होते. त्यांतर्गत त्यांनी जीडीएस हॉटेलमधील तीन वातानुकुलित खोल्या आरक्षित केल्या होत्या. त्याकरिता २९ नोव्हेंबर २०१६ रोजी ४२ हजार ६०४ रुपये हॉटेलच्या खात्यात जमा केले होते. परंतु, २८ डिसेंबर २०१६ रोजी हॉटेलने त्यांना आरक्षण रद्द झाल्याचे कळवले. त्यानंतर ग्राहकांनी हॉटेलला दिलेली रक्कम परत मागितली. परंतु, वारंवार संपर्क व पाठपुरावा करूनही त्यांना रक्कम देण्यात आली नाही. परिणामी, ग्राहकांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. आरक्षणाकरिता दिलेले ४२ हजार ६०४ रुपये व अन्य हॉटेलमध्ये राहण्यासाठी झालेला ६१ हजार ८७६ रुपयाचा खर्च १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावा आणि शारीरिक-मानसिक त्रासापोटी २५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई देण्यात यावी अशी विनंती त्यांनी मंचला केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.निर्णयातील निरीक्षणग्राहकांनी रक्कम परत मिळविण्यासाठी हॉटेलकडे सलग पाठपुरावा केला. परंतु, हॉटेलने त्यांना दाद दिली नाही. त्यावरून हॉटेलने ग्राहकांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते. परिणामी, ग्राहक त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी व शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचhotelहॉटेल