शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

ग्राहक मंच : नवी दिल्लीतील जीडीएस हॉटेलला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 20:51 IST

नवी दिल्ली येथील जीडीएस हॉटेलविरुद्ध ११ ग्राहकांनी दाखल केलेली तक्रार नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंशत: मंजूर केली व ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश दिलेत. त्यामुळे जीडीएस हॉटेलला जोरदार दणका बसला.

ठळक मुद्दे११ ग्राहकांची तक्रार अंशत: मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवी दिल्ली येथील जीडीएस हॉटेलविरुद्ध ११ ग्राहकांनी दाखल केलेली तक्रार नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अंशत: मंजूर केली व ग्राहकांच्या हिताचे विविध आदेश दिलेत. त्यामुळे जीडीएस हॉटेलला जोरदार दणका बसला.ग्राहकांचे ४२ हजार ६०४ रुपये १३ टक्के व्याजाने परत करण्यात यावे असा आदेश मंचने हॉटेलला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही हॉटेलने द्यायची आहे. ४२ हजार ६०४ रुपयांवर २९ नोव्हेंबर २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू होणार आहे. या आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी हॉटेलला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला.ग्राहकांमध्ये नागपूर येथील डॉ. राहुल देशमुख व इतर १० व्यक्तींचा समावेश आहे. त्यांनी २०१६ मधील ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी मध्य प्रदेशातील पेंचमधील किप्लिंग कोर्ट रिसोर्ट येथे जाण्याचे ठरवले होते. त्यांतर्गत त्यांनी जीडीएस हॉटेलमधील तीन वातानुकुलित खोल्या आरक्षित केल्या होत्या. त्याकरिता २९ नोव्हेंबर २०१६ रोजी ४२ हजार ६०४ रुपये हॉटेलच्या खात्यात जमा केले होते. परंतु, २८ डिसेंबर २०१६ रोजी हॉटेलने त्यांना आरक्षण रद्द झाल्याचे कळवले. त्यानंतर ग्राहकांनी हॉटेलला दिलेली रक्कम परत मागितली. परंतु, वारंवार संपर्क व पाठपुरावा करूनही त्यांना रक्कम देण्यात आली नाही. परिणामी, ग्राहकांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. आरक्षणाकरिता दिलेले ४२ हजार ६०४ रुपये व अन्य हॉटेलमध्ये राहण्यासाठी झालेला ६१ हजार ८७६ रुपयाचा खर्च १८ टक्के व्याजाने परत करण्यात यावा आणि शारीरिक-मानसिक त्रासापोटी २५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई देण्यात यावी अशी विनंती त्यांनी मंचला केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.निर्णयातील निरीक्षणग्राहकांनी रक्कम परत मिळविण्यासाठी हॉटेलकडे सलग पाठपुरावा केला. परंतु, हॉटेलने त्यांना दाद दिली नाही. त्यावरून हॉटेलने ग्राहकांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट होते. परिणामी, ग्राहक त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी व शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासापोटी भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचhotelहॉटेल