शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

‘ग्राहक संरक्षण कायद्या’पासून ग्राहकच वंचित

By admin | Updated: December 24, 2014 00:48 IST

२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन. १९८६ साली आपल्या देशात या तारखेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ पास करण्यात आला. या कायद्याच्या कक्षा वेळोवेळी रुंदावण्यात आल्या. हा कायदा सुटसुटीत असून,

नागपूर : २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन. १९८६ साली आपल्या देशात या तारखेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ पास करण्यात आला. या कायद्याच्या कक्षा वेळोवेळी रुंदावण्यात आल्या. हा कायदा सुटसुटीत असून, त्यांची यथायोग्य अंमलबजावणी झाली तर ग्राहकांवर अन्याय करणाऱ्यांना नक्की जरब बसू शकेल. पण या संरक्षण कायद्यापासून ग्राहकच वंचित असल्याचा अनुभव आहे.कायदेशीर कारवाईची तरतूदकायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. यामध्ये खासगी, सरकारी आणि सहकारी संस्थांचाही समावेश करण्यात आला आहे. ग्राहकाला सोपे पडेल आणि त्याच्यावरचा अन्याय तो स्वत:च दूर करू शकेल, अशा प्रकारची जी कार्यपद्धती या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अपेक्षित आहे, त्या हेतूला सुद्धा जणू हरताळ फासला जावा, असे एक पाऊल उचलण्यात आले आहे. ते कळल्यानंतर कोणाही सामान्य व्यक्तीला ‘ग्राहकांना कोणी वालीच नाही’, असेच वाटेल. ग्राहकांची फसवणूक कोण करते, ही बाब गंभीर आहे. ग्राहकाचे हित किंवा फायदाग्राहक म्हणजे अशी व्यक्ती जी विशिष्ट मोबदल्यात एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करते किंवा मूळ मालकाच्या परवानगीने त्या वस्तू वा सेवेचा वापर करीत असते. समाजातील प्रत्येक व्यक्ती ही एका अर्थाने ग्राहकच असते. मग त्याच्या आड त्या व्यक्तीचा व्यवसाय, त्याचे वय, लिंग, विचारधारा काही येत नाही. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्री यांचा केंद्रबिंदू आहे. ग्राहकांच्या समाधानावरच संबंधित क्षेत्राचे यश अवलंबून असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात ग्राहकांच्या हिताला प्राधान्य द्यावे लागते. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व सदस्यांची पदे रिक्तराज्यात ३९ ग्राहक मंच आहेत. मात्र, यातल्या बऱ्याच ठिकाणी मंचाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदे रिकामी आहेत. ‘जागो ग्राहक जागो’ ही जाहिरात करण्यापलीकडे सरकारने ग्राहकांच्या जागृतीसाठी काहीच केलेले दिसत नाही. त्यामुळे आता ग्राहकांनाच आपल्या हक्कासाठी पुढे यावे लागणार आहे. ग्राहक हक्क चळवळराष्ट्रीय ग्राहक दिनी ग्राहक प्रबोधनासाठी प्रदर्शन, प्रात्यक्षिक, प्रबोधनपर व्याख्याने जनजागृतीसाठी आयोजित केली जातात. नागरी पुरवठा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, वजनमापे कार्यालय, आदी आस्थापनांमार्फत याचे आयोजन केले जाते. ग्राहक संरक्षक कायदा, माहितीचा अधिकार, लोकपाल विधेयक, जनलोकपाल विधेयक अशा संस्थांची निर्मिती ही समाजजीवनात शिस्त लागावी म्हणून आहे. अंमलबजावणी खरोखरच दुरापास्तदेशात अंमलबजावणी नावाची गोष्ट खरोखरच दुरापास्त होऊ लागली आहे, असा अनुभव विविध नियम, कायदे याबाबत नेहमीच येऊ लागला आहे. नियम मोडला तरी काही शिक्षा वगैरे होत नाही, असा अनेकांचा समज आहे. हीच अवस्था ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत दिसत आहे. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, सेवा पुरवठादार हे सगळे ग्राहकांना गृहितच धरत आहेत. त्यांच्या आस्थापनांमधील अंतर्गत तक्रार निवारण यंत्रणासुद्धा बरेच वेळा नावापुरत्याच अस्तित्त्वात आहेत. कारण मुळात कायदा राबवण्यामध्ये, ग्राहकांना दिलासा देण्यामध्ये शासन यंत्रणेलाच रस नाही. (प्रतिनिधी)