शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

नागपुरातील जामठा स्टेडियमच्या बांधकामाला परवानगीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:36 AM

जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए)स्टेडियमच्या बांधकामाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देजय जवान जय किसान संघटनेची कारवाईची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिज्ञापत्रात खुलासा 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए)स्टेडियमच्या बांधकामाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्य माहिती आयोगाला सादर शपथपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात तसा खुलासा करण्यात आला आहे.असे असताना व्हीसीएने एवढे मोठे बांधकाम केलेच कसे व येथे आंतरराष्ट्रीय सामने कसे खेळविण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार व माहिती अधिकार कार्यकर्ते टी. एच.नायडू यांनी याकडे लक्ष वेधत, याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.मौजा जामठा येथे २००८ मध्ये व्हीसीएने स्टेडियम उभारले. मात्र हे स्टेडियम उभारताना महत्त्वाच्या परवानगीच घेण्यात आल्या नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते टी. एच. नायडू यांनी १२ जानेवारी २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत व्हीसीए स्टेडियमबाबत माहिती मागितली होती. मिळालेल्या माहितीवर समाधान न झाल्याने नायडू यांनी राज्य माहिती आयुक्त यांच्या नागपूर खंडपीठासमोर तक्रार दाखल केली. व्हीसीए स्टेडियमच्या बांधकामाबाबत माहिती उपलब्ध नसेल तर तसे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाºयांनी खंडपीठासमोर सादर करावे. माहिती गहाळ झाली असल्यास महाराष्ट्र अभिलेख अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करून कार्यवाहीचा अहवाल खंडपीठासमोर सादर करावा, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी (प्रस्तुतकार) कमलेश हरिचंद्र शेंद्रे यांनी सादर केलेल्या शपथपत्रात स्टेडियमला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बांधकाम परवानगी प्रदान करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने या स्टेडियमकडून मनोरंजन कर कसा वसूल केला व यातून आलेल्या निधीचा उपयोग कुठे केला, असा सवाल प्रशांत पवार यांनी उपस्थित करीत, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा तसेच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.या स्टेडियमची क्षमता ४० हजार प्रेक्षकांची आहे. येथे आंतरराष्ट्रीय सामने होतात. स्टेडियमला टाऊन प्लॅनिंग, पर्यावरण, नागपूर सुधार प्रन्यास व अग्निशमन या विभागाकडून परवानगी नाही. स्डेडियम अवैध असल्याने या ठिकाणी सामने भरविणे म्हणजे नागरिकांची सुरक्षा धोक्यात टाकण्यासारखे आहे. प्रसंगी दुर्घटना घडली तर आपद्ग्रस्तांना विम्याचा कुठलाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे पूर्ण परवानगी मिळेपर्यंत येथे कुठलेही सामने खेळविले जाऊ नये, अशी मागणी करीत याबाबत इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल(आयसीसी)कडे तक्रार करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Cricketक्रिकेट