शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मतदारसंघ आरक्षणाचा वाद, सीमांकन आयोगाला नोटीस

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: July 13, 2023 17:48 IST

हायकोर्ट : येत्या ९ ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता २०११ मधील जनगणनेनुसार मतदारसंघ आरक्षित ठेवण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सीमांकन आयोगाला नोटीस बजावून येत्या ९ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद तभाने यांनी ही याचिका दाखल केली आहे. देशात दर १० वर्षांनी जनगणना केली जाते व राज्यघटनेतील आर्टिकल ३३० अनुसार निवडणुकीमध्ये मागासवर्गीयांकरिता त्यांच्या लोकसंख्येनुसार मतदारसंघ आरक्षित ठेवणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. भारतीय निवडणूक आयोगाने यावर स्वत:ची भूमिका स्पष्ट करताना सीमांकन कायद्यातील कलम ८(ए) अनुसार मतदारसंघ आरक्षित करण्याचा अधिकार सीमांकन आयोगाला आहे, अशी माहिती दिली.

आतापर्यंत या कायद्यात २००१ मधील जनगणनेचा समावेश होता. त्यामुळे त्या आधारावर मतदारसंघ आरक्षित केले गेले. २०१९ मध्ये या कायद्यात दुरुस्ती करून २०११ मधील जनगणनेचा समावेश करण्यात आला आहे, याकडेही निवडणूक आयोगाने लक्ष वेधले. परिणामी, न्यायालयाने या याचिकेत सीमांकन आयोगाला प्रतिवादी करण्याची याचिकाकर्त्याला परवानगी दिली व आयोगाला नोटीस बजावली. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. आनंद परचुरे व ॲड. पवन सहारे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयreservationआरक्षण