शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

हा तर जातीय चौकटीत बंदिस्त करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:32 IST

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकरांमुळे आहे. परंतु मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले आणि दलितांचे आंबेडकर असे गणित लावून या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात येत असून मराठा आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन : वामन निंबाळकर लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकरांमुळे आहे. परंतु मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले आणि दलितांचे आंबेडकर असे गणित लावून या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात येत असून मराठा आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.समाज प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. वामन निंबाळकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या ‘वाहत्या जखमांचा प्रदेश : आकलन व समीक्षा’ आणि ‘चळवळीचे दिवस’ (अधुरं स्वकथन) या दोन पुस्तकांचे प्रकाशन दीक्षाभूमी येथील डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या कर्मवीर दादासाहेब ऊर्फ ना.ह. कुंभारे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, ललिता सबनीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, स्नेहलता निंबाळकर उपस्थित होत्या. डॉ. सबनीस म्हणाले, सध्याची स्थिती बिकट आहे. कर्मठ आंबेडकरी व लिबरल आंबेडकरी असे दोन गट निर्माण झाले आहेत. ते आपापल्या परीने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मांडणी करतात. वामन निंबाळकरांची सत्यवादी व औदार्याची आहे. ते संवेदनशील कवी होते. वाहत्या जखमांचा प्रदेश यातून त्यांना केवळ जखमा दाखवायच्या नाहीत तर त्या जखमांवर मलमपट्टी कोण करणार याचे चिंतन आहे. गिरीश गांधी म्हणाले, निंबाळकर यांच्या दलित पँथरच्या प्रवासापासूनचा मी साक्षीदार आहे. विचारवंतांनी समाजात मिसळू नये असे संकेत असताना हा विचारवंत सर्वात मिसळायचा. त्यांच्यासारख्या धडपडणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे. अ‍ॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, वामन निंबाळकर यांनी आपल्या लिखाणातून दलित चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले. त्यांनी समाजाकडून कोणतीही अपेक्षा केली नाही. निंबाळकर हे निसर्गाने घडविलेले कार्यकर्ते होते. प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचे कार्य सीमारेषांना ओलांडणारे असून या साहित्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवतेचा मापदंड निर्माण केला. चळवळीचे दिवस हे स्वकथन एका व्यक्तीच्या प्रगतीचे कथन नसून समाजाच्या भळभळत्या वेदना मांडण्याचे काम यातून झाले आहे. प्रास्ताविक स्नेहलता निंबाळकर यांनी केले. संचालन प्रा. डॉ. वीणा राऊत यांनी केले. आभार स्नेहलता खंडागळे यांनी मानले.

 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसnagpurनागपूर