शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

३८ शेतकऱ्यांनी सादर केले संमतीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2016 02:26 IST

राज्याच्या संतुलित व समतोल विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी ...

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग : १०६.२६ हेक्टर शेतजमीन उपलब्धनागपूर : राज्याच्या संतुलित व समतोल विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे. नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्गासाठी ३८ शेतकऱ्यांनी १०६.२६ हेक्टर शेतजमिनी उपलब्ध करून देण्यासंबंधीचे संमतीपत्र जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले आहे.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना भेटून हिंगणा तालुक्यातील भानसोली येथील नीतेश कैलाशचंद्र बगडिया (सर्व्हे नं.५५/३), जिजाबाई शेषराव हिवरकर (५५/१), अ‍ॅड. दिनेश नामदेव तायडे (५५/४), धनराज पांडुरंग हिवरकर व ललिता हिवरकर (५५/२), पुष्पाताई दशरथ कामडे मोहगाव (५५/३), तसेच रामा वनासाखे, बंडू दौलतराव ठाकरे, देवनार गोविंदा उईके, दिवानजी मारोती मडावी या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीसंदर्भातील पत्र सादर केले. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते.समृध्दी महामार्ग प्रकल्पासाठी हळदगाव येथील ११ शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिले असून सावंगी व भानसोली येथील प्रत्येकी १२ तर वाडेगाव येथील एक अशा ३६ शेतकऱ्यांनी जिराईत जमीन असलेल्या १०३.५६ हेक्टरसाठी संमतीपत्र दिले आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या खरपी गांधी, बोरगाव येथील दोन शेतकऱ्यांनी २.७ हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणासाठी संमतीपत्र जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले आहे. नागपूर ते मुंबई या दोन महानगरादरम्यान अतिजलद वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून महामार्गाच्या विकास व बांधणीसाठी लॅण्ड पुलिंग मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे. भूधारकांसाठी देय मोबदला आणि त्या अनुषंगिक लाभासाठी मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांचा व भूधारकांच्या हिताचा हा निर्णय असल्यामुळे शेतकऱ्यांनीही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शेती उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र सादर केले आहे. नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा हिंगणा तालुक्यातील शिवमडका येथून सुरू होत असून हळदगाव, वडगाव येथून वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. २८.५ किलोमीटर लांबीच्या महामागार्साठी २० गावातील खासगी, शासकीय, वनजमीन अशा एकूण १३४९.५२ हेक्टर जमिनीवरून हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ८१९ खातेदारांचा समावेश असून भूसंचयन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)