शहरं
Join us  
Trending Stories
1
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
2
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
5
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
6
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
7
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
8
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
9
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
10
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
11
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
12
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
13
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
14
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
15
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
16
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
17
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!
18
“त्रिभाषा प्रकरणी हरकती नोंदवण्याची मुदत वाढवावी, आडमार्गाने...”; मनसेचे समितीला पत्र
19
Mohammed Shami: "मी तंदुरुस्त आहे आणि..."  ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीने सोडले मौन! 
20
Saif Ali Khan : "तू मरणार आहेस का?", रक्ताच्या थारोळ्यात पाहून तैमूरने विचारलेला प्रश्न, सैफने दिलं 'हे' उत्तर

३८ शेतकऱ्यांनी सादर केले संमतीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2016 02:26 IST

राज्याच्या संतुलित व समतोल विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी ...

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग : १०६.२६ हेक्टर शेतजमीन उपलब्धनागपूर : राज्याच्या संतुलित व समतोल विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आहे. नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्गासाठी ३८ शेतकऱ्यांनी १०६.२६ हेक्टर शेतजमिनी उपलब्ध करून देण्यासंबंधीचे संमतीपत्र जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले आहे.जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना भेटून हिंगणा तालुक्यातील भानसोली येथील नीतेश कैलाशचंद्र बगडिया (सर्व्हे नं.५५/३), जिजाबाई शेषराव हिवरकर (५५/१), अ‍ॅड. दिनेश नामदेव तायडे (५५/४), धनराज पांडुरंग हिवरकर व ललिता हिवरकर (५५/२), पुष्पाताई दशरथ कामडे मोहगाव (५५/३), तसेच रामा वनासाखे, बंडू दौलतराव ठाकरे, देवनार गोविंदा उईके, दिवानजी मारोती मडावी या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीसंदर्भातील पत्र सादर केले. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते.समृध्दी महामार्ग प्रकल्पासाठी हळदगाव येथील ११ शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिले असून सावंगी व भानसोली येथील प्रत्येकी १२ तर वाडेगाव येथील एक अशा ३६ शेतकऱ्यांनी जिराईत जमीन असलेल्या १०३.५६ हेक्टरसाठी संमतीपत्र दिले आहे. सिंचनाची सुविधा असलेल्या खरपी गांधी, बोरगाव येथील दोन शेतकऱ्यांनी २.७ हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणासाठी संमतीपत्र जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर केले आहे. नागपूर ते मुंबई या दोन महानगरादरम्यान अतिजलद वाहतूक सुलभ होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला असून महामार्गाच्या विकास व बांधणीसाठी लॅण्ड पुलिंग मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे. भूधारकांसाठी देय मोबदला आणि त्या अनुषंगिक लाभासाठी मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांचा व भूधारकांच्या हिताचा हा निर्णय असल्यामुळे शेतकऱ्यांनीही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शेती उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र सादर केले आहे. नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती मार्ग हा हिंगणा तालुक्यातील शिवमडका येथून सुरू होत असून हळदगाव, वडगाव येथून वर्धा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. २८.५ किलोमीटर लांबीच्या महामागार्साठी २० गावातील खासगी, शासकीय, वनजमीन अशा एकूण १३४९.५२ हेक्टर जमिनीवरून हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ८१९ खातेदारांचा समावेश असून भूसंचयन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र समृध्दी महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)