शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात काँग्रेसचा 'फ्लॅगमार्च'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 20:34 IST

केंद्र सरकारच्या संविधान व लोकशाही विरोधी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवन येथून काँग्रेसतर्फे ‘भारत बचाओ-संविधान बचाओ फ्लॅगमार्च’ काढण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेसचा १३५ वा स्थापना दिन उत्साहात : ‘भारत बचाओ-संविधान बचाओ’च्या घोषणांनी परिसर दणाणला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस पक्षाच्या १३५ व्या स्थापना दिनानिमित्त शनिवारी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेसतर्फे देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्याहस्ते पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केंद्र सरकारच्या संविधान व लोकशाही विरोधी नागरिकता सुधारणा कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात देवडिया काँग्रेस भवन येथून काँग्रेसतर्फे ‘भारत बचाओ-संविधान बचाओ फ्लॅगमार्च’ काढण्यात आला.फ्लॅगमार्च गांधीगेट येथील शिवाजी महाराज व टिळक पुतळा येथे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नातिक चौक-चिटणीस पार्क मार्गे देवडिया भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी ‘संविधान बचाओ-भारत बचाओ’, अशा प्रकारे घोषणांनी परिसर दुमदुमला होता.रॅलीमध्ये विकास ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव अतुल कोटेचा,उमाकांत अग्निहोत्री, प्रवक्ते अतुल लोढे, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड.अभिजित वंजारी, गिरीश पांडव, बंटी शेळके, रिचा जैन, डॉ.गजराज हटेवार, बंडोपंत टेंभुर्णे, प्रा.दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे,अल्पसंख्यांक अध्यक्ष इर्शाद अली, वासुदेव ढोके,नगरसेवक संजय महाकाळकर, नितीन साठवणे, रमेश पुणेकर,संदीप सहारे,भावना लोणारे, प्रशांत धवड, आशा उईके, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक,सेवादल अध्यक्ष प्रवीण आगरे,रामगोविंद खोब्रागडे सहित प्रदेश व शहर काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारास धक्का पोहचला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन विकास ठाकरे यांनी यावेळी केले. २८ डिसेंबर १९८५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशात सर्वधर्मसमभाव व कोणत्या स्वरुपाचा प्रांतवाद वा जातीयवाद न आणता राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे सूत्र स्वीकारण्यात आले होते. त्यावर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. महात्मा गांधी यांच्या अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संविधानानुसार देश चालायला हवा. परंतु केंद्रातील भाजप सरकार जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकcongressकाँग्रेसMorchaमोर्चा