शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

काँग्रेस कधीच संपणार नाही : स्थापनादिनी विजयाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:26 IST

कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. काँग्रेस हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही, असे सांगत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संकल्प नेते व कार्यकर्त्यांनी केला.

ठळक मुद्देपक्षात इनकमिंग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. काँग्रेस हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही, असे सांगत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संकल्प नेते व कार्यकर्त्यांनी केला.नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे शुक्रवारी देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेसचा १३४ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष विकास ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, उपाध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, माजी विश्वस्त अनंत घारड, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड.अभिजित वंजारी, माजी महापौर नरेश गावंडे, माजी आ. यशवंत बाजीराव, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, जयंत लुटे, संदेश सिंगलकर,नंदा पराते,रमेश पुणेकर, नितीश ग्वालवंशी,रामगोविंद खोब्रागडे, विवेक निकोसे, पंकज लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णरावजी पांडव यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. सुमारे ७० कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाला तीन राज्यांचे मुख्यमंत्री येणारशहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा ८ जानेवारी रोजी दीक्षाभूमी, ताजबाग, गणेश टेकडी येथे दर्शन करून सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन करुन रामटेक येथे जाहीर सभा होईल. १२ जानेवारी रोजी यात्रा नागपुरात दाखल होईल. १३ जानेवारी रोजी नागपुरात संघटनात्मक बैठक होईल. तीत राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अ.भा. काँग्रेस कमिटीचे नेते सहभागी होतील. या नेत्यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष यात्रेचा समारोप होईल.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण