शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

काँग्रेस कधीच संपणार नाही : स्थापनादिनी विजयाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:26 IST

कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. काँग्रेस हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही, असे सांगत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संकल्प नेते व कार्यकर्त्यांनी केला.

ठळक मुद्देपक्षात इनकमिंग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉग्रेसने देशाला एकसूत्रात बांधण्याचे काम केले. पण मोदी सरकार जनतेला खोटी आश्वासने देऊन लुबाडण्याचे काम करीत आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना जनतेने धडा शिकविला. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. काँग्रेस हा विचार आहे, तो कधीच संपू शकत नाही, असे सांगत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा संकल्प नेते व कार्यकर्त्यांनी केला.नागपूर शहर काँग्रेस समितीतर्फे शुक्रवारी देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेसचा १३४ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष विकास ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, उपाध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, माजी विश्वस्त अनंत घारड, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, अ‍ॅड.अभिजित वंजारी, माजी महापौर नरेश गावंडे, माजी आ. यशवंत बाजीराव, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, जयंत लुटे, संदेश सिंगलकर,नंदा पराते,रमेश पुणेकर, नितीश ग्वालवंशी,रामगोविंद खोब्रागडे, विवेक निकोसे, पंकज लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णरावजी पांडव यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. सुमारे ७० कार्यकर्त्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाला तीन राज्यांचे मुख्यमंत्री येणारशहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले की, प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा ८ जानेवारी रोजी दीक्षाभूमी, ताजबाग, गणेश टेकडी येथे दर्शन करून सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन करुन रामटेक येथे जाहीर सभा होईल. १२ जानेवारी रोजी यात्रा नागपुरात दाखल होईल. १३ जानेवारी रोजी नागपुरात संघटनात्मक बैठक होईल. तीत राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अ.भा. काँग्रेस कमिटीचे नेते सहभागी होतील. या नेत्यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष यात्रेचा समारोप होईल.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण