शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
3
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
4
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
5
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
6
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
7
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
8
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
9
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
10
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
11
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
12
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
13
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
14
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
15
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
16
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
17
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
18
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
19
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
20
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न

हिवाळी अधिवेशनाच्या ‘मोर्चे’बांधणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची ‘आघाडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 12:51 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला खिंडीत गाठण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘मोर्चे’बांधणी केली जात आहे.

ठळक मुद्देचव्हाण, तटकरे बैठकांसाठी सक्रिय विदर्भावरच सर्वांची भिस्त

कमलेश वानखेडे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला खिंडीत गाठण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘मोर्चे’बांधणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ११ डिसेंबर रोजी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे तर काँग्रेसतर्फे १३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चा निघणार आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या आधी मोर्चाचा मुहूर्त साधत एकप्रकारे काँग्रेसवर कुरघोडी केली आहे.११ तारखेला राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासह सामान्य नागरिक सहभागी झाल्यावर पुन्हा १३ तारखेला काँग्रेसच्या मोर्चात सहभागी होतील का, या प्रश्नाने काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे. शिवाय दोन वेगवेगळ्या मोर्चांनी विरोधकांमधील फूट चव्हाट्यावर येऊन सत्ताधाऱ्यांचे मनोबल उंचावेल. यामुळे आता दोन्ही मोर्चे एकाच दिवशी काढता येईल का, यावर दोन्ही पक्ष गांभीर्याने विचार करीत आहेत.मोर्चे वेगवेगळे निघाले तर गर्दी जमविण्यासाठी दोन्ही पक्षांचा चांगलाच कस लागणार आहे. गर्दीसाठी दोन्ही पक्षांची भिस्त विदर्भावरच आहे. याची जाणीव असल्यामुळे मोर्चाच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी विदर्भातील प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांच्या विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. सुनील तटकरे व अजित पवार यांनी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी अमरावती येथे तर दुपारनंतर नागपूर येथे विभागीय बैठक आयोजित केली आहे. खा. अशोक चव्हाण यांनी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी अमरावती येथे व दुपारनंतर नागपूर येथे विभागीय बैठक आयोजित केली आहे. दोन्ही पक्षाच्या या बैठकांना प्रभारी, जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. काँग्रेसतर्फे कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी गेल्यावर्षी विधिमंडळावर काढण्यात आलेला मोर्चा लक्षणीय ठरला होता. लोकसभा व विधानसभेतील पराभवानंतर मरगळ आलेल्या काँग्रेसला या मोर्चात झालेल्या गर्दीने नवसंजीवनी दिली होती. यात नागपूरसह विदर्भाचे योगदान मोठे होते. विदर्भाच्या अकराही जिल्ह्यातून गर्दी जमविण्याचे स्थानिक नेत्यांनी आखलेले नियोजन यशस्वी ठरले होते. पुढे या मोर्चाच्या भरवशावर काँग्रेस नेत्यांना विधानसभेत व राज्यभर सरकारला कोंडीत पकडण्याची ऊर्जा मिळाली होती. त्यामुळे १३ डिसेंबरचा मोर्चा काँग्रेस नेत्यांनी चांगलाच मनावर घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमकपणा वाढला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनाधार वाढविण्यासाठी विदर्भावर फोकस केले आहे. आॅक्टोबर महिन्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा करीत पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या. पक्षाची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर नुकतेच राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवस विदर्भात मुक्काम ठोकत गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आदी जिल्ह्यातील गावांचा दौरा केला. शेतकऱ्यांशी चर्चा केली. आता १ डिसेंबरपासून यवतमाळ ते नागपूरपर्यंत दिंडी काढली जाणार आहे. ११ डिसेंबर रोजी ही दिंडी मोर्चात परिवर्तित होईल. राष्ट्रवादीची टीम मोर्चेबांधणीसाठी कामाला लागली आहे.

दोन्ही मोर्चे एकत्रची तयारी, ‘१२-१२-१२’चा मूहुर्तहिवाळी अधिवेशनावर निघणाऱ्या मोर्च्यांचे मूल्यांकन साधारणत: त्यात होणाऱ्या गर्दीवरून केले जाते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे मोर्चे वेगवेगळे निघाले व गर्दी जमली नाही तर मोर्चे फसू शकतात. यामुळे आता दोन्ही पक्षांनी मिळून एकच मोर्चा काढायचा व मुख्य सभेला दोन्ही पक्षांच्या मुख्य नेत्यांनी संबोधित करायचे असे नियोजन उच्च पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. सूत्रानुसार १२ डिसेंबर रोजी दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणाहून मोर्चा काढतील व दुपारी १२ वाजता एकत्र येत ‘१२-१२-१२’चा मुहुर्त साधतील.

टॅग्स :Politicsराजकारण