शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:02 IST

सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात तीनदा भेट झाली आहे आणि राज्यात आघाडी होणारच हा विश्वास असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीतील राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपाविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे झाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेत फारसा फरक नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात तीनदा भेट झाली आहे आणि राज्यात आघाडी होणारच हा विश्वास असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. पटेल यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चेदरम्यान त्यांनी विविध विषयांवर स्पष्ट मते मांडली.सत्तास्थापनेनंतर सुरुवातीची तीन वर्षे महागाई कमी करण्यासाठी भाजपासमोर अतिशय पोषक वातावरण होते. मात्र ते काम करण्यात अपयशी ठरले. वर्तमान राजकीय परिस्थितीत विरोधी पक्षांनी भाजपाला थांबविण्यासाठी सर्व मतभेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व नेमके कोण करेल हे सांगणे कठीण आहे. मात्र शरद पवार हे विरोधी पक्षांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावू शकतात, असे पटेल म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या जागा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात कमी होतील. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा यासारख्या राज्यांत तर विरोधकांनी एकत्र येणे भाजपासमोर अनेक आव्हाने उभे करणारे राहणार आहे, असे मत पटेल यांनी व्यक्त केले.पक्ष आत्मचिंतन करणारराष्ट्रवादी पक्षाला आत्मचिंतनाची आवश्यकता आहे व पुढील लोकसभा निवडणुकांनंतर ते आम्ही निश्चितपणे करू, असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसपासून नक्कीच वेगळा झाला मात्र विचारधारा बदलू शकली नाही. जर वेगळी भूमिका घेऊन राष्ट्रवादीने अगोदरच सुरुवात केली असती तर वेगळे चित्र राहिले असते, असेदेखील ते म्हणाले. ‘सोशल मीडिया’ची निवडणुकांमध्ये मोठी भूमिका दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्ष यात कुठेतरी मागे पडत असल्याचे वास्तव होते. मात्र आता आम्ही कात टाकत असून विशेष ‘आयटी सेल’ स्थापन करण्यात आला असल्याची माहिती पटेल यांनी दिली.सरकारचे आर्थिक धोरणच स्पष्ट नाहीयावेळी प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणावरदेखील प्रश्न उपस्थित केले. सरकारकडून दर १५ दिवसाला काही ना काही घोषणा करण्यात येते. मात्र सरकारचे आर्थिक धोरणच स्पष्ट नाही. नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सरकारने फार मोठी चूक केली. आर्थिक धोरणाकडे सरकारने दुर्लक्षच केले. देशात आता १०० बिलियन डॉलरची निर्यात कमी झाली आहे. सरकारने लोकांच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या आहेत. मात्र त्यांची पूर्तता होत नसल्यामुळे जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे, असे देखील पटेल यावेळी म्हणाले.मुखर्जींच्या संघस्थानी जाण्यात गैर काय ?माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जात असल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र विरोधी विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यक्रमाला जाण्यात गैर काहीच नाही. भारतीय राजकारण्यांनी ही मानसिकता बदलायला हवी, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस