शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळली; आशिष देशमुखांचा प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 13:29 IST

महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणात नाराजी

नागपूर : राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर उमटलाय. काल काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परराज्यातील नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. तर, आज काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली त्यामुळं पक्षात मोठया प्रमाणात नाराजी आहे, बदल होत असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र, याच प्रकारचे निर्णय होत असतील तर सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या निर्णयाबाबत जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न मलाही पडू लागला आहे, असे आशिष देशमुख यावेळी म्हणाले. 

इम्रान प्रतापगढी यांच मूळ नाव इम्रान खान हे आहे, मात्र ते प्रतापगढी लावतात. ते एक कव्वाल आहेत, त्यांना उत्तर प्रदेश सोडून महाराष्ट्रात उमेदवारी दिली यामुळं काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि आमच्यासारखे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढविली. यात साडेसहा लाखांपेक्षा अधिक मतांनी ते पराभूत झाले, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, आता त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली त्यामुळं मोठया प्रमाणात नाराजी आहे, असे देशमुख म्हणाले. 

देशमुख यांनी एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला. एक पद एक व्यक्ती’ आणि एका कुटुंबात एका सदस्याला उमेदवारी ही सर्व कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. मग, पी. चिदंबरम यांचा मुलगा लोकसभेत असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली? प्रमोद तिवारी यांची मुलगी आमदार असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. ५० वर्षावरील नेत्यांना तिकीट देणार नाही असा निर्णय झाला असताना १५ दिवसात या निर्णयाला तिलांजली दिली, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. 

याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू. मात्र, वारंवार हे होत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बघावं तरी कोणाकडे, हा प्रश्न उपस्थित होतोय. या सर्व कारणांमुळे मी प्रदेश काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे, असे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान पदाचा राजीनामा देत असलो तरी पक्ष सोडणार नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाAshish Deshmukhआशीष देशमुख