शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी उफाळली; आशिष देशमुखांचा प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 13:29 IST

महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणात नाराजी

नागपूर : राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर उमटलाय. काल काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परराज्यातील नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. तर, आज काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.

काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली त्यामुळं पक्षात मोठया प्रमाणात नाराजी आहे, बदल होत असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र, याच प्रकारचे निर्णय होत असतील तर सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या निर्णयाबाबत जो प्रश्न पडलाय तोच प्रश्न मलाही पडू लागला आहे, असे आशिष देशमुख यावेळी म्हणाले. 

इम्रान प्रतापगढी यांच मूळ नाव इम्रान खान हे आहे, मात्र ते प्रतापगढी लावतात. ते एक कव्वाल आहेत, त्यांना उत्तर प्रदेश सोडून महाराष्ट्रात उमेदवारी दिली यामुळं काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते, आमदार आणि आमच्यासारखे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढविली. यात साडेसहा लाखांपेक्षा अधिक मतांनी ते पराभूत झाले, त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, आता त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रातील कर्तबगार नेत्यांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली त्यामुळं मोठया प्रमाणात नाराजी आहे, असे देशमुख म्हणाले. 

देशमुख यांनी एका कुटुंबातून एकाच सदस्याला उमेदवारीच्या ठरावाच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला. एक पद एक व्यक्ती’ आणि एका कुटुंबात एका सदस्याला उमेदवारी ही सर्व कार्यपद्धती ठरविण्यात आली होती. मग, पी. चिदंबरम यांचा मुलगा लोकसभेत असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी का दिली? प्रमोद तिवारी यांची मुलगी आमदार असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. ५० वर्षावरील नेत्यांना तिकीट देणार नाही असा निर्णय झाला असताना १५ दिवसात या निर्णयाला तिलांजली दिली, असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. 

याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करू. मात्र, वारंवार हे होत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बघावं तरी कोणाकडे, हा प्रश्न उपस्थित होतोय. या सर्व कारणांमुळे मी प्रदेश काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे, असे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान पदाचा राजीनामा देत असलो तरी पक्ष सोडणार नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाAshish Deshmukhआशीष देशमुख