शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

'बेरोजगारीला काँग्रेसच जबाबदार, मोदी सरकारने 32 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज दिलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:17 IST

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला

नागपूर - देशात फक्त काँग्रेसमुळेच गरिबी आली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काहीही फायदा झाला नाही, असे म्हणत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, कर्नाटक हिजाब वादावर बोलताना शाळेत जो युनिफॉर्म आहे, तोच घाला, बुरखा नको, असेही आठवले म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्तेवर आले नसते, असे म्हणत भाजपच्या विकासकामांची आणि रोजगार उपलब्ध केल्याची माहितीही आठवलेंनी दिली. देशात मुद्रा योजनेतून ३२ कोटी लोकांना कर्ज मिळाले असून या कर्जाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळाल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, यंदाच्या वर्षात ६० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे प्रावधान बजेटमध्ये आहे, असेही ते म्हणाले. 

शिवसेनेला पुन्हा एकदा आवाहन 

शिवसेनेच्या भल्यासाठी आपण त्यांना आवाहन केले की, भाजपासोबत या आपले मित्र आहेत. विचार करायचा की नाही ही त्यांची इच्छा आहे. पण, लवकर बरे व्हा आणि आमच्यासोबत या, आवाहन आठवलेंनी शिवसेनेला केले आहे. मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे मन करुन कायदे मागे घेतले. त्यामुळे, सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा मोदींना असून पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळाले, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसUnemploymentबेरोजगारी