शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

'बेरोजगारीला काँग्रेसच जबाबदार, मोदी सरकारने 32 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं कर्ज दिलं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:17 IST

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला

नागपूर - देशात फक्त काँग्रेसमुळेच गरिबी आली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काहीही फायदा झाला नाही, असे म्हणत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, कर्नाटक हिजाब वादावर बोलताना शाळेत जो युनिफॉर्म आहे, तोच घाला, बुरखा नको, असेही आठवले म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्तेवर आले नसते, असे म्हणत भाजपच्या विकासकामांची आणि रोजगार उपलब्ध केल्याची माहितीही आठवलेंनी दिली. देशात मुद्रा योजनेतून ३२ कोटी लोकांना कर्ज मिळाले असून या कर्जाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना रोजगार मिळाल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच, यंदाच्या वर्षात ६० लाख लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे प्रावधान बजेटमध्ये आहे, असेही ते म्हणाले. 

शिवसेनेला पुन्हा एकदा आवाहन 

शिवसेनेच्या भल्यासाठी आपण त्यांना आवाहन केले की, भाजपासोबत या आपले मित्र आहेत. विचार करायचा की नाही ही त्यांची इच्छा आहे. पण, लवकर बरे व्हा आणि आमच्यासोबत या, आवाहन आठवलेंनी शिवसेनेला केले आहे. मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे मन करुन कायदे मागे घेतले. त्यामुळे, सगळ्या शेतकऱ्यांचा पाठिंबा मोदींना असून पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळाले, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसUnemploymentबेरोजगारी