शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

काँग्रेस उमेदवारांनी रॅली काढून अर्ज भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:44 IST

नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारी सदर भागातील बिशॉप कॉटन स्कूल ग्राऊंड येथून रॅली काढून संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने ढोलताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.

ठळक मुद्देनागपूर लोकसभा मतदार संघात नाना पटोले तर रामटेक मतदार संघात किशोर गजभिये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले व रामटेक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवारी सदर भागातील बिशॉप कॉटन स्कूल ग्राऊंड येथून रॅली काढून संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने ढोलताशांच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी खासदार गेव्ह आवारी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार अशोक धवड, दीनानाथ पडोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, यादवराव देवगडे, अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, शेख हुसैन,महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दुनेश्वर पेठे, माजी महापौर किशोर डोरले, अतुल लोंढे, प्रशांत पवार, नगरसेवक मनोज सांगोळे, नितीन साठवणे, प्रशांत धवड, बंटी शेळके, मनोज साबळे, हरीश ग्वालबन्शी, पुरुषोत्तम हजारे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, प्रवीण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुदे, दिलीप पनकु ले, रमेश फुले, बजरंगसिंग परिहार, वेदप्रकाश आर्य, राजू नागुलवार यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ - नाना पटोलेलोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो, असे प्रतिपादन नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस