शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नगरसेवकांची सहल पोहचली निवडणूक आयाेगाच्या टेबलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 11:15 IST

भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. विधान परिषद निवडणूक होत असलेल्या मतदारसंघातील जवळपास २००० व्यक्तींना देशातील विविध ठिकाणी पर्यटनाला पाठविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देछाेटू भाेयर यांनी केली कारवाईची मागणी

नागपूर : भाजपचे नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांची सहल वादाच्या भाेवऱ्यात सापडली आहे. त्यांना सहलीला नेण्यावरून काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद निवडणुकीतील मतदारांना बाहेर पाठविल्याचा आक्षेप घेत बावनकुळे यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भोयर यांनी केली आहे.

भाेयर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, भाजप उमेदवार बावनकुळे यांनी विधान परिषद निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जवळपास २ हजार लोक व त्यांच्या कुटुंबीयांना उचलून नेले व विविध ठिकाणी ठेवले आहे. हे सर्व विधान परिषद निवडणुकीतील मतदार आहेत. हा प्रकार राजकीय पक्ष व उमेदवारांना लागू असलेल्या माॅडेल काेड ऑफ कंडक्टचे सर्रास उल्लंघन असून बावनकुळे यांनी चालविलेला हा प्रकार अनैतिक आणि बेकायदेशीर आहे, ‘रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट, १९५१’ च्या कलम १२३ नुसार भ्रष्ट प्रथेत समाविष्ट असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

नागरिकांना मतदानाचा हक्क मुक्तपणे वापरता यावा आणि मुक्त व निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी अशा अनुचित प्रकारावर कठाेर कारवाई करावी, बावनकुळे यांनी कायदा पायदळी तुडविल्याने त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी भाेयर यांनी निवडणूक आयाेगाकडे केली आहे.

पराभव दिसत असल्यामुळेच बेताल आरोप

भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले व उमेदवारी मिळवलेले छोटू भोयर हे पहिल्या दिवसापासूनच बेताल आरोप करीत आहेत. त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली पण गटबाजीत गुंतलेली काँग्रेस नेत्यांची साथ मिळेनाशी झाली आहे. आता खूप मोठा दारुण पराभव दिसत असल्यामुळे असे बालिश आरोप करून भोयर हे स्वत:चे हसू करुन घेत आहेत. त्यांच्या एकाही आरोपात काही तथ्य नाही

- अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, मनपा, नागपूर

टॅग्स :PoliticsराजकारणVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस